सध्या महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. आज (२३ जुलै)ही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पु्ण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही शहरांसाठी थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला. नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टीही जाहीर केली. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस
तर मुंबईतही रात्रभर पाऊस मुसळधार पाऊस कोसळतोय. शिवाय अनेक भागात पावसाचे पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे.मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस कायम आहे.शिवाय आज २३ जुलै रोजी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.मुंबईसह ठाणे, कल्याण, डोबिंवली, बोरिवली, अंधेरी, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल, पालघर, भिवंडी या परिसरात रात्रभरपासून पावस सुरु असून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. मुंबई, पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांता पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली. ज्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला.
मुंबईकरांचे पाणीकपातीचे संकट टळले
दरम्यान या सततच्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी एक असलेल्या तानसा जलाशय भरून ओव्हरफ्लो झाले. विहार आणि तुळसी आता तानसा तलावही ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे मुंबईतील सातपैकी तीन तलाव पूर्ण भरले आहेत. सर्व जलाशयांमधील एकत्रित पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 62 टक्क्यांवर पोहोचला आहे. ज्यामुळे आता मुंबईकरांचे पाणीकपातीचे संकट टळले आहे.
पालघरमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती
पालघरमध्ये पावसाचा जोरदार पाऊस सुरू असून हडाणू ते विवर लोकलसेवा पूर्णपणे ठप्प आहे. यासोबतच आवश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळा, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय तसेच अंगणवाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली.तसेच आज डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधील जनजीवन विस्कळीत झाल्याच पाहायला मिळतंय. मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
सांगलीतही अतिवृष्टी
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा चांदोली खोऱ्यात व पाथरपुंज येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज गुरुवारी 23 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत धरण 75.13 टक्के भरले असून एकूण पाणीसाठा 25.84 टीएमसी इतका झाला आहे.








