मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाणार? 15 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

BEST संयुक्त कामगार कृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेतन कराराचा फेरविचार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

बेमुदत आंदोलनाचाही इशारा

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा तसेच बेमुदत आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. यामागील कारण म्हणजे कृती समितीने 21 जून रोजी झालेल्या वेतन करारावर आक्षेप घेतला आहे.कर्मचाऱ्यांशी कोणतीही व्यापक चर्चा न करता हा करार करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या आणि प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर वेतन कराराचा फेरविचार करून सर्व संबंधित संघटनांशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने 15 ऑगस्टपर्यंत प्रमुख मागण्यांबाबत  दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. वेतन कराराच्या फेरविचाराची प्रमुख मागणी बेस्ट कर्मचाऱ्यांनी केली आहे.समितीच्या देखील आणखी काही प्रमुख मागण्या आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

सुधारित वेतनश्रेणी लागू करावी.
महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सेवा-शर्ती लागू कराव्यात.
आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाला शासनाकडून आर्थिक मदत द्यावी.
प्रलंबित वेतन कराराची तातडीने अंमलबजावणी करावी.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘समान काम, समान दाम’ या तत्त्वानुसार वेतन द्यावे.

15 ऑगस्टनंतर बेमुदत संपाचा इशारा

समितीने स्पष्ट केले आहे की, 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर जातील. त्यामुळे मुंबईतील बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता राज्य सरकार आणि बेस्ट प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे कर्मचारी तसेच मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षाला महाडमध्ये तरुण नेतृत्वाचे बळ; युवक अध्यक्षपदी महत्त्वाची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महाडतालुका युवक अध्यक्षपदी करण चव्हाण यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा एक भाग म्हणून प्रदेश पातळीवरून ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र…

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरु असून २१ जुलै ते २६ जुलैपर्यंत पावसाचा जोर जास्तच राहणार असल्याचा अंदाज…

Leave a Reply

You Missed

मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाणार? 15 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाणार? 15 ऑगस्टपर्यंत निर्णय द्या अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

25 दिवस उपोषणावर सोनम वांगचुक, सरकार गप्प का? जंतर-मंतर ते दिल्ली हिंसाचाराचा संपूर्ण लेखाजोखा

25 दिवस उपोषणावर सोनम वांगचुक, सरकार गप्प का? जंतर-मंतर ते दिल्ली हिंसाचाराचा संपूर्ण लेखाजोखा

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षाला महाडमध्ये तरुण नेतृत्वाचे बळ; युवक अध्यक्षपदी महत्त्वाची निवड

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षाला महाडमध्ये तरुण नेतृत्वाचे बळ; युवक अध्यक्षपदी महत्त्वाची निवड

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह या शहरांमध्येही अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये; रिलीज डेट काय माहितीये?

सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये; रिलीज डेट काय माहितीये?

सडपातळ शरीर, डोळ्यांखाली सूज; सलमान खानची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, सलमाननेच दिलं उत्तर

सडपातळ शरीर, डोळ्यांखाली सूज; सलमान खानची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, सलमाननेच दिलं उत्तर

महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

महत्त्वाची बातमी! CJPच्या दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू;२३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?

कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चिघळलं? आंदोलनाला रोखण्यासाठी लागू केलेले कलम १६३ नक्की आहे तरी काय?

पावसामुळे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला फटका; दर्शनाबाबत भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय

पावसामुळे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला फटका; दर्शनाबाबत भाविकांसाठी महत्त्वाचा  निर्णय