जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन तापलं, आता वकिलांचाही पाठिंबा, पण सर्वोच्च न्यायालयाची वकिलांना फटकार

NEET पेपर फुटीच्या कथित प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता एक नवीन वळण मिळालं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत, थेट सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी संविधानाची प्रस्तावना वाचून या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र,दुसरीकडे या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांनी वकिलांना चांगलेच सुनावले आहे.

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वकिलांचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर फुटीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अमानुष कारवाई आणि अश्रूधुराचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला जात.विद्यार्थ्यांवरील या कारवाईच्या निषेधार्थ सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी एकत्र येत संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यामध्ये आता ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी त्यांची भूमिका मांडून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

‘आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी येथे आलो आहोत’

त्या म्हणाल्या,” आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी येथे आलो आहोत. आम्ही न्यायाच्या बाजूने उभे आहोत आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, हीच आमची मागणी आहे. हे आंदोलन आमच्यासाठी नाही, तर विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आहे.विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयासमोर उभे राहून न्यायाची मागणी करणे हे वकिलांचे कर्तव्य आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आणि जबाबदारी न्याय देण्याची आहे. म्हणूनच आम्ही या न्यायमंदिरात विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन उपस्थित आहोत.” असं म्हणत त्यांनी वकिलांच्या कर्तव्याची जाणीव करून देत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे.


न्यायालयाची रोखठोक टिप्पणी अन् वकिलांनाच फटकार 

मात्र, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा प्रयत्न स्पष्टपणे फेटाळून लावला. एवढंच नाही तर एका वकिलाने जंतर-मंतरवरील पोलीस कारवाई आणि आंदोलनाचे व्हिडिओ खंडपीठासमोर मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आंदोलनाचे व्हिडिओ पाहण्यास नकार देत, कोर्टाचा वेळ वाया न घालवण्याचा सल्ला सरन्यायाधीशांनी संबंधित वकिलाला दिला. त्यामुळे एकीकडे रस्त्यावरून न्यायाची मागणी करणारे विद्यार्थी आणि त्यांना मिळालेला वकिलांचा पाठिंबा, तर दुसरीकडे न्यायाधीशांच्या खंडपीठाने घेतलेली विरोधातील भूमिका यामुळे आता NEET पेपर फुटीचा हा मुद्दा अधिकच पेटण्याची शक्यता आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत असणारी योजना आहे. स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिलांसाठी आता एक मोठं गिफ्ट सरकारकडून देण्यात येणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या…

Leave a Reply

You Missed

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार