जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाचे पडसाद देशभर पसरले होते. गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज (२५ जुलै २०२६)दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ज्यामुळे जंतर मंतर येथील सुरू असलेले आंदोलन संपुष्टात आले आहे.परीक्षा पद्धतीत सुधारणा, नीट पेपरफुटीसाठी जबाबदारी निश्चित करणे आणि केंद्रीय शिक्षणमात्र म्हणून प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीच्या नेतृत्वाखाली २० जून रोजी जंतर मंतर येथे हे विद्यार्थी आंदोलन सुरू झाले होते.
मंत्री प्रल्हाद जोशी सांभाळणार शिक्षण मंत्रालयाचा कारभार
पण अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान मोदी यांना पाठवला आहे.प्रधान यांनी म्हटले आहे की, राष्ट्रसेवा करणे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च प्राधान्य आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. ते आता धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी शिक्षण मंत्रालयाचा कारभार सांभाळणार आहेत.
प्रल्हाद जोशींकडे ही अतिरिक्त जबाबदारी देखील
पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे.अशा परिस्थितीत, आता शिक्षण मंत्रालयाचा कारभार कोण सांभाळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारने ही अतिरिक्त जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे दिली आहे. प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाची देखील जबाबदारी आहे.
कोण आहेत प्रल्हाद जोशी ?
प्रल्हाद जोशी हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते सध्या एनडीए सरकारमध्ये ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी धारवाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विनोद आसुती यांचा 97,324 मतांनी पराभव करून सलग पाचव्यांदा विजय मिळवला.
दोन्ही पक्ष चार आठवड्यांनंतर पुन्हा भेटणार
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि सरकारने संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर, कॉकरोच जनता पार्टीने शनिवारी नीट वादावरून सुरू असलेले आपले ३६ दिवसांचे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा घडवून आणण्यासाठी दोन्ही पक्ष चार आठवड्यांनंतर पुन्हा भेटतील, असे सीजेपीने म्हटले आहे.








