CJPची केंद्र सरकारसोबत काल म्हणजे २४ जुलै रोजी झालेल्या बैठकीत काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी देखील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीवर CJP ठाम होती. गेल्या आठवडाभरापासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता आता वाढत चालली होती.धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही, असे सीजेपीकडून स्पष्ट करण्यात सांगण्यात आलं होत.
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश
तसेच CJPची केंद्र सरकारसोबत काल म्हणजे २४ जुलै रोजी झालेल्या बैठकीत काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी देखील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीवर CJP ठाम होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवलं
२५ जुलै रोजी CJPने ३:३० वाजेपर्यंत सरकारलाचा शेवटचा ‘अल्टिमेटम’दिला होता. पण जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर कॉकरोच जनता पार्टीची पुढचा प्लॅन काय असेल यावर सीजेपी प्रवक्ता आशुतोष रांका यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं होत. मात्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर CJP ला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
.सरकारच्या निर्णयानंतर जंतर मंतरवर मोठा जल्लोष
विद्यार्थ्यांनी सरकारसमोर तीन प्रमुख अटी ठेवल्या होत्या. यात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख अट होती.सरकारसोबत कालच्या बैठकीनंतर आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरकारला अल्टीमेटम देण्यात आला होता. आज पुन्हा बैठक होणार होती. पण आजच्या बैठकीपुर्वीच सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय जाहीर केला.सरकारच्या निर्णयानंतर जंतर मंतरवर मोठा जल्लोषपाहायला मिळाला.








