नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं आहे. मागच्या एका महिन्यांपासून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी मागील महिन्याभरासाठी मेहनत घेत आहेत.त्यांना संपूर्ण देशभरातील तरुणांची साथ लाभली आहे.मात्र गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आणि विविध प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला नेतृत्त्व देणारे अभिजीत दिपके यांची प्रकृती खालावली असल्याची बातमी समोर आली होती. त्यांनतर त्यांनी आता एक व्हिडिओ शेअर करत टायफॉइडची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
अभिजीत दीपके यांना टाइफाइडची लागण
अभिजीत दीपके यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून टाइफाइड झाल्याचे सांगितले. व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं की, ‘माझी तब्येत बिघडली आहे. मला वैद्यकीय अहवालात टाइफाइड झाल्याचं समोर आलं आहे.त्यामुळे माझ्यावर उपचार सुरू आहेत.सकाळ आणि सायंकाळ माझ्यावर उपचार सुरू आहेत’.तरीही धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात लढाई सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 20 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवल्यानंतर दीपके यांनी अन्नत्याग सुरू केला होता, ज्यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती.
अभिजीत दीपकेंची तब्येत बिघडल्याने आंदोलनावर परिणाम होणार?
अभिजीत दीपकेंची तब्येत बिघडल्याने आंदोलनावर परिणाम होणार असल्याचं बोलले जात आहे. परंतु कॉक्रोच जनता पार्टीचे दोन प्रतिनिधी हे सातत्याने सरकारशी चर्चा करत आहे. दीपके आजारी असले, तरी त्यांचे इतर सहकारी आंदोलन हाताळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आंदोलनावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.
Have been diagnosed with typhoid, but the fight will go on until Dharmendra Pradhan resigns! pic.twitter.com/8iHSZdF6K7
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 25, 2026
आज सरकारसोबत CJPची तिसरी बैठक
या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये तिसरी बैठक होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेत नुकसानभरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक चर्चा झाली असली, तरी मुख्य मागणीवर अद्याप तिढा कायम आहे.
धर्मेंद्र प्रधान राजीनाम्याबाबत निर्णय होणार?
CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी याबाबत भूमिका मांडताना सांगितले, “कालच्या बैठकीत नुकसानभरपाई आणि कायदेशीर प्रकरणांबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सैद्धांतिक सहमती झाली आहे. आज लिखित करार मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, आमची मुख्य मागणी असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. जर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नसतील, तर अशा बैठकांना काही अर्थ उरत नाही.” असं म्हणते CJP धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.








