धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर, CJP चा पुढचा प्लान हा असणार; आशुतोष रांकाने स्पष्टच सांगितलं

सरकारसोबत झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या मुद्द्यांवर एकमत झाले असून, आज सरकारकडून लेखी संमती मिळण्याची त्यांना आशा आहे. या मुद्द्यांवर चर्चा पुढे सरकली आहे, परंतु आंदोलनाची मुख्य मागणी अद्याप अपूर्ण आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही

CJPची केंद्र सरकारसोबत काल म्हणजे २४ जुलै रोजी झालेल्या बैठकीत काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी देखील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीवर CJP ठाम आहे. गेल्या आठवडाभरापासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता आता वाढत चालली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही, असे सीजेपीकडून स्पष्ट करण्यात सांगण्यात आलं आहे.

३:३० वाजेपर्यंत सरकारलाचा शेवटचा ‘अल्टिमेटम’

एवढंच नाही तर आज म्हणजे २५ जुलैपर्यंत CJPने ३:३० वाजेपर्यंत सरकारलाचा शेवटचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. पण जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर कॉकरोच जनता पार्टीची पुढचा प्लॅन काय असेल यावर सीजेपी प्रवक्ता आशुतोष रांका यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

पुढची रणनीती ही असणार

“सरकारने नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे माध्यमे आणि टिव्ही चॅनेल्सवर धर्मेंद्र प्रधान राजनामा देणार नाही, असं म्हटलं जात आहे. असे असेल तर सरकारने याबाबत आम्हाला स्पष्टपणे सांगावे,असे असेल तर अशा बैठका निरर्थक ठरतील. त्यानंतर आमची जी रणनीती असेल त्यावर आम्ही काम सुरू करू. देशातील विद्यार्थ्यांना फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे, जो खूप सोपा आहे पण जर तुम्ही तसं करणार नसाल तर आम्हालाही काही कठोर निर्णय घ्यावे लागतील,” असं स्पष्टपणे आशुतोष रांका यांनी सांगितलं.

सरकारकडून लेखी संमती मिळण्याची आशा

आशुतोष रांका पुढे म्हणाले “सरकारसोबत झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या मुद्द्यांवर एकमत झाले असून, आज सरकारकडून लेखी संमती मिळण्याची आशा आहे. आणि याच मुद्द्यांवर चर्चा पुढे सरकली आहे, परंतु आंदोलनाची मुख्य मागणी अद्याप अपूर्ण आहे.”

४७ एनटीए अधिकाऱ्यांच्या केलेल्या बडतर्फीबाबत CJP चं मत काय?

सरकारने ४७ एनटीए अधिकाऱ्यांच्या केलेल्या बडतर्फीबाबत देखील त्यांनी मत व्यक्त केलं, ते म्हणाले, “आम्हाला अनेक तपशील तपासावे लागतील, पण आमचा मुद्दा तोच आहे. अंतिम जबाबदारी शिक्षणमंत्र्यांची आहे, कारण सर्व पेपरफुटी आणि नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते थेट जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आम्ही इतर मोठ्या सुधारणांवर सातत्याने चर्चा करत आहोत.”

CJP ची ठाम भूमिका पाहता आणि आज केंद्र सरकारला देण्यात आलेला अल्टीमेटम पाहता CJP च्या पुढच्या आंदोलनाची दिशा नक्कीच समोर येणार आहे. त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी कोण माहितीयेत?

    जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाचे पडसाद देशभर पसरले होते. गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री…

    CJP च्या आंदोलनाला यश! अखेर धर्मेंद्र प्रधानांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा, जंतर मंतरवर मोठा जल्लोष

    CJPची केंद्र सरकारसोबत काल म्हणजे २४ जुलै रोजी झालेल्या बैठकीत काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी देखील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीवर CJP ठाम होती. गेल्या आठवडाभरापासून…

    Leave a Reply

    You Missed

    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी कोण माहितीयेत?

    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी कोण माहितीयेत?

    CJP च्या आंदोलनाला यश! अखेर धर्मेंद्र प्रधानांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा, जंतर मंतरवर मोठा जल्लोष

    CJP च्या आंदोलनाला यश! अखेर धर्मेंद्र प्रधानांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा, जंतर मंतरवर मोठा जल्लोष

    अभिजीत दीपके तापाने फणफणले, टायफॉइडची लागण;जंतर-मंतर सोडलं, आंदोलनाची पुढची दिशा काय असणार?

    अभिजीत दीपके तापाने फणफणले, टायफॉइडची लागण;जंतर-मंतर सोडलं, आंदोलनाची पुढची दिशा काय असणार?

    धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर, CJP चा पुढचा प्लान हा असणार; आशुतोष रांकाने स्पष्टच सांगितलं

    धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर, CJP चा पुढचा प्लान हा असणार; आशुतोष रांकाने स्पष्टच सांगितलं

    विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजू नका; आधी त्यांच्या न्यायासाठी उभे राहा!

    विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजू नका; आधी त्यांच्या न्यायासाठी उभे राहा!

    महत्त्वाची अपडेट!अख्ख्या देशाचं लक्ष लागलेली CJP व केंद्रसरकारची निर्णायक बैठक अखेर सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम, निर्णय काय होणार?

    महत्त्वाची अपडेट!अख्ख्या देशाचं लक्ष लागलेली CJP व केंद्रसरकारची निर्णायक बैठक अखेर सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम, निर्णय काय होणार?

    मालाड-मढमधील धडपड्या तरुणाची मोठी झेप;आदित्य ठाकरे यांच्याकडून आदित्य सुतार यांच्यावर नवी जबाबदारी

    मालाड-मढमधील धडपड्या तरुणाची मोठी झेप;आदित्य ठाकरे यांच्याकडून आदित्य सुतार यांच्यावर नवी जबाबदारी

    सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर मागे; पेपरफुटीविरोधात PM मोदींची मोठी घोषणा, नक्की काय घडलं?

    सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर मागे; पेपरफुटीविरोधात PM मोदींची मोठी घोषणा, नक्की काय घडलं?

    देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बोरिवलीत ‘सेवामय उपक्रम’; माजी खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान

    देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बोरिवलीत ‘सेवामय उपक्रम’; माजी खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान