धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर, CJP चा पुढचा प्लान हा असणार; आशुतोष रांकाने स्पष्टच सांगितलं

सरकारसोबत झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या मुद्द्यांवर एकमत झाले असून, आज सरकारकडून लेखी संमती मिळण्याची त्यांना आशा आहे. या मुद्द्यांवर चर्चा पुढे सरकली आहे, परंतु आंदोलनाची मुख्य मागणी अद्याप अपूर्ण आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही

CJPची केंद्र सरकारसोबत काल म्हणजे २४ जुलै रोजी झालेल्या बैठकीत काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी देखील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीवर CJP ठाम आहे. गेल्या आठवडाभरापासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता आता वाढत चालली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही, असे सीजेपीकडून स्पष्ट करण्यात सांगण्यात आलं आहे.

३:३० वाजेपर्यंत सरकारलाचा शेवटचा ‘अल्टिमेटम’

एवढंच नाही तर आज म्हणजे २५ जुलैपर्यंत CJPने ३:३० वाजेपर्यंत सरकारलाचा शेवटचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. पण जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर कॉकरोच जनता पार्टीची पुढचा प्लॅन काय असेल यावर सीजेपी प्रवक्ता आशुतोष रांका यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

पुढची रणनीती ही असणार

“सरकारने नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे माध्यमे आणि टिव्ही चॅनेल्सवर धर्मेंद्र प्रधान राजनामा देणार नाही, असं म्हटलं जात आहे. असे असेल तर सरकारने याबाबत आम्हाला स्पष्टपणे सांगावे,असे असेल तर अशा बैठका निरर्थक ठरतील. त्यानंतर आमची जी रणनीती असेल त्यावर आम्ही काम सुरू करू. देशातील विद्यार्थ्यांना फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे, जो खूप सोपा आहे पण जर तुम्ही तसं करणार नसाल तर आम्हालाही काही कठोर निर्णय घ्यावे लागतील,” असं स्पष्टपणे आशुतोष रांका यांनी सांगितलं.

सरकारकडून लेखी संमती मिळण्याची आशा

आशुतोष रांका पुढे म्हणाले “सरकारसोबत झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या मुद्द्यांवर एकमत झाले असून, आज सरकारकडून लेखी संमती मिळण्याची आशा आहे. आणि याच मुद्द्यांवर चर्चा पुढे सरकली आहे, परंतु आंदोलनाची मुख्य मागणी अद्याप अपूर्ण आहे.”

४७ एनटीए अधिकाऱ्यांच्या केलेल्या बडतर्फीबाबत CJP चं मत काय?

सरकारने ४७ एनटीए अधिकाऱ्यांच्या केलेल्या बडतर्फीबाबत देखील त्यांनी मत व्यक्त केलं, ते म्हणाले, “आम्हाला अनेक तपशील तपासावे लागतील, पण आमचा मुद्दा तोच आहे. अंतिम जबाबदारी शिक्षणमंत्र्यांची आहे, कारण सर्व पेपरफुटी आणि नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते थेट जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आम्ही इतर मोठ्या सुधारणांवर सातत्याने चर्चा करत आहोत.”

CJP ची ठाम भूमिका पाहता आणि आज केंद्र सरकारला देण्यात आलेला अल्टीमेटम पाहता CJP च्या पुढच्या आंदोलनाची दिशा नक्कीच समोर येणार आहे. त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत असणारी योजना आहे. स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिलांसाठी आता एक मोठं गिफ्ट सरकारकडून देण्यात येणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार