अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा,उद्घाटनानंतर २० दिवसांतच ८४ ठिकाणी रस्ता खचला; भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट

अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा करण्यात आला होता मात्र अवघ्या १८ ते २० दिवसांतच या दाव्याची धूळधाण उडाली आहे. उद्घाटनानंतर तब्बल ८४ ठिकाणी रस्ता खचल्याने या हजारो कोटींच्या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशमध्ये. बहुचर्चित लखनऊ-कानपुर एक्सप्रेसवेचे उद्घाटन करताना उत्तर प्रदेशातील नॅशनल हायवे अमेरिकेसारखे होतील असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला गेला होता. मात्र, भाजप खासदारांच्या भावाने बांधलेल्या या रस्त्याची अवघ्या १८ ते २० दिवसांतच या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर दुरुस्त केलेला हा डांबरी रस्ता सुकवण्यासाठी चक्क पंख्यांचा वापर केला जात असल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापलेलं दिसत आहे.

अखिलेश यादवांचा टोला: “ही भाजपच्या प्रगतीची नवी हवा!”

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर हा व्हिडिओ शेअर करत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “ही भाजपच्या प्रगतीची नवी हवा आहे! ज्या रस्त्याचे काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झाले, तो वाळवण्यासाठी पंखे लावावे लागत आहेत, ही अत्यंत हास्यास्पद बाब आहे.”, असा टोला यादव यांनी लगावला आहे.

६३ किमीचा रस्ता अन् ४,७०० कोटींचा खर्च; परिस्थिती नेमकी काय?

६३ किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेसवेसाठी ₹४,७०० कोटी खर्च झाले आहेत. म्हणजे १ किमी रस्त्यासाठी तब्बल ७५ कोटी खर्च करण्यात आले आहेत. अवघ्या १८ दिवसांत कानपूर लेनवर ३९ ठिकाणी तर लखनऊ लेनवर ४५ ठिकाणी रस्ता खचल्यामुळे दुरुस्ती करावी लागली आहे. ३० जुलै रोजी एक मालवाहू ट्रक या रस्त्यावर खचला होता.यानंतर NHAI ने १००० स्क्वेअर फूट रस्ता उखडून २ फूट खड्डा भरून पुन्हा तयार केला, पण अवघ्या १२ तासांत तिथेही पुन्हा १ ते २ इंचाच्या भेगा पडल्या आहेत.

भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट

एका बाजूच्या प्रवासासाठी २७५ रुपये टोलही घेण्यात येत होता. मात्र, रस्ता खराब झाल्याने आणि डायव्हर्शनमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने NHAI ने काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली पूर्णपणे बंद केली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कडक पावले उचलली आहेत. एक्सप्रेसवे बनवणाऱ्या ‘PNC इन्फ्राटेक लिमिटेड’ या कंपनीला ‘नॉन-परफॉर्मर’ घोषित करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे शिफारस करण्यात आली आहे. ही कंपनी भाजप राज्यसभा खासदार नवीन जैन यांचे भाऊ प्रदीप जैन यांची आहे. या नात्यातूनच हे कंत्राट कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीसह दोन उपकंपन्यांवर दोन वर्षांपूर्वीच बंदी आणण्यात आली होती, नंतर ती उठविण्यातही आली. रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्याचा ३ कोटींचा संपूर्ण खर्च कंत्राटदार कंपनीकडूनच वसूल केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

रस्ता का खचला? 

NHAI च्या प्राथमिक अंदाजानुसार, मुसळधार पावसामुळे रस्त्याखालच्या मातीच्या थरांमध्ये पाणी साचलं आहे. ज्यामुळे मातीची पकड सैल झाली अन् रस्ता खचण्याची समस्या निर्माण झाली. मात्र, एवढा प्रचंड खर्च करूनही रस्ता खचण्याचे तांत्रिक आणि खरे कारण शोधण्यासाठी IIT खडकपूरच्या तज्ज्ञांच्या टीमला चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच ‘लेझर प्रोफिलोमीटर’ तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण ६३ किमीच्या रस्त्याची तपासणी केली जाणार आहे.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

    बुधवारी ५ ऑगस्ट २०२६ शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. दरम्यान…

    अभिजीत दीपकेची मोठी घोषणा! देशभरात राबवणार ‘ही’ रणनीती; CJP मुळे सरकारचं टेन्शन वाढलं

    कॉक्रोच जनता पार्टीची आगामी रणनीती ठरली असून अभिजीत दीपकेंनी आपल्या पार्टीची आगामी भूमिकेबद्दल माहिती दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत आपल्या पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट…

    Leave a Reply

    You Missed

    अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा,उद्घाटनानंतर २० दिवसांतच ८४ ठिकाणी रस्ता खचला; भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट

    अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा,उद्घाटनानंतर २० दिवसांतच ८४ ठिकाणी रस्ता खचला; भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट

    ‘माझा डेटा,माझी जबाबदारी’! अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन, डिजिटल युगात सजग राहण्याचे धडे

    ‘माझा डेटा,माझी जबाबदारी’! अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन, डिजिटल युगात सजग राहण्याचे धडे

    शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

    शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

    अभिजीत दीपकेची मोठी घोषणा! देशभरात राबवणार ‘ही’ रणनीती; CJP मुळे सरकारचं टेन्शन वाढलं

    अभिजीत दीपकेची मोठी घोषणा! देशभरात राबवणार ‘ही’ रणनीती; CJP मुळे सरकारचं टेन्शन वाढलं

    अभिनेता राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा लिलाव; डोक्यावर 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

    अभिनेता राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा लिलाव; डोक्यावर 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

    शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

    शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

    तकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका!अनलॉग पनीरवर बंदी;55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्सनाही झटका

    तकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका!अनलॉग पनीरवर बंदी;55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्सनाही झटका

    साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न; महाराष्ट्राभरातून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद

    साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न; महाराष्ट्राभरातून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे गेलं? एका मुद्द्यामुळे शिंदे गट अडचणीत, सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद; कोर्टात काय घडलं?

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे गेलं? एका मुद्द्यामुळे शिंदे गट अडचणीत, सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद; कोर्टात काय घडलं?