संवेदनशील महाराष्ट्र जेव्हा एकत्र येतो, तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होतं. एका चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी अवघ्या ४ दिवसांत तब्बल १० कोटी रुपये गोळा करून महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा माणुसकीचं एक अनोखं आणि भव्य उदाहरण जगासमोर ठेवलं आहे.
११ महिन्यांच्या बाळाला गंभीर आजार, १० कोटींचे इंजेक्शन
हृदय दरेकर या ११ महिन्यांच्या बाळ ‘SMA Type1’ म्हणजे ‘स्पायनल मस्कुलर ॲट्रॉफी’. या आजारामध्ये शरीरातील सर्व स्नायू हळूहळू काम करणे बंद करतात. बाळाला श्वास घेणे आणि गिळणेही कठीण होऊन बसते. यावर उपचार म्हणून अमेरिकेतून एक विशेष जनुक थेरपी इंजेक्शन मागवावे लागणार होते. मात्र, या उपचाराचा खर्च तब्बल १० कोटी रुपयांच्या घरात होता. एका सामान्य कुटुंबासाठी ही रक्कम उभारणे केवळ अशक्य होते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन
बाळाची बिकट परिस्थिती पाहून मदत करण्यासाठी पुढे आले ‘गरड खानावळी’चे मालक. त्यांनी स्वतः दरेकर कुटुंबाला आर्थिक मदत केलीच, शिवाय एक अत्यंत भावूक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. गरड खानावळीच्या मालकांनी तसा व्हिडीओ बनवून सोशल मिडियाच्या माध्यामातून त्या बाळाच्या उपचारासाठी म्हणजेच त्या इंजेक्शसाठी पैशांच्या मदतीचे आवाहन केले होते. ज्या व्यक्तीला जशी जमेल, तेवढी तशी आणि त्याप्रमाणे मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी स्वत: दरेकर कुटुंबाला मदत केली आहे.
View this post on Instagram
गरड व्हिडीओच्या माध्यमातून म्हाणाले होते, “१० कोटी रुपयांचं इंजेक्शन.एका लहानग्या जीवाला वाचवण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे.आपण दिलेला प्रत्येक छोटा-मोठा हातभार या बाळासाठी नवीन आयुष्य देऊ शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी सढळ हाताने मदत करा, आणि ज्यांना शक्य नाही, त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून योग्य वेळी मदत पोहोचू शकेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला काही कमी पडणार नाही” असं म्हणत त्यांनी विनंती केली होती.
संवेदनशील महाराष्ट्र, तब्बल ४ दिवसांत १० कोटी जमा
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या आवाहनाला संपूर्ण महाराष्ट्राने ज्या वेगाने प्रतिसाद दिला, तो मन हेलावून टाकणारा होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार अशा सर्वांनीच सढळ हाताने मदत केली आणि चमत्कार घडला. अवघ्या ४ दिवसांच्या आत १० कोटी रुपयांचा भलामोठा निधी पूर्ण झाला. ही केवळ पैशांची मदत नव्हती, तर महाराष्ट्रातील संवेदनशील आणि दानशूर लोकांच्या एकतेची मोठी ताकद होती.छोट्या-छोट्या मदतीतून उभा राहिलेला हा मोठा आधार आज एका जीवासाठी आशेचा किरण ठरला आहे.
खरंच,आपल्या महाराष्ट्रातील लोक किती दयाळू आणि दानशूर आहेत, याचं हे एक सुंदर उदाहरण आणि आदर्श सर्वांसमोर उभा राहिला आहे. हृदयच्या कुटुंबाने सर्व महाराष्ट्राचे , मदत करणाऱ्या हातांचे मनापासून आभार मानले आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका
दरम्यान या व्हिडीओनंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवरही टीका केली आहे. सोशल मीडियावर नागरिकांमधून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.अशा दुर्मिळ आणि प्राणघातक आजारांसाठी सामान्य कुटुंबांना दरवेळी सोशल मीडिया किंवा क्राउडफंडिंगवरच अवलंबून राहावे लागणार का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.केंद्र आणि राज्य सरकारने अशा आजारांच्या उपचारासाठी, इंजेक्शनवरील करमाफीसाठी आणि रुग्णांना वेळेत आर्थिक मदत देण्यासाठी ठोस धोरण व विशेष वैद्यकीय निधीची तरतूद करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांनी केली आहे.








