महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

संवेदनशील महाराष्ट्र जेव्हा एकत्र येतो, तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होतं. एका चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी अवघ्या ४ दिवसांत तब्बल १० कोटी रुपये गोळा करून महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा माणुसकीचं एक अनोखं आणि भव्य उदाहरण जगासमोर ठेवलं आहे.

११ महिन्यांच्या बाळाला गंभीर आजार, १० कोटींचे इंजेक्शन

हृदय दरेकर या ११ महिन्यांच्या बाळ ‘SMA Type1’ म्हणजे ‘स्पायनल मस्कुलर ॲट्रॉफी’. या आजारामध्ये शरीरातील सर्व स्नायू हळूहळू काम करणे बंद करतात. बाळाला श्वास घेणे आणि गिळणेही कठीण होऊन बसते. यावर उपचार म्हणून अमेरिकेतून एक विशेष जनुक थेरपी इंजेक्शन मागवावे लागणार होते. मात्र, या उपचाराचा खर्च तब्बल १० कोटी रुपयांच्या घरात होता. एका सामान्य कुटुंबासाठी ही रक्कम उभारणे केवळ अशक्य होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन

बाळाची बिकट परिस्थिती पाहून मदत करण्यासाठी पुढे आले ‘गरड खानावळी’चे मालक. त्यांनी स्वतः दरेकर कुटुंबाला आर्थिक मदत केलीच, शिवाय एक अत्यंत भावूक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. गरड खानावळीच्या मालकांनी तसा व्हिडीओ बनवून सोशल मिडियाच्या माध्यामातून त्या बाळाच्या उपचारासाठी म्हणजेच त्या इंजेक्शसाठी पैशांच्या मदतीचे आवाहन केले होते. ज्या व्यक्तीला जशी जमेल, तेवढी तशी आणि त्याप्रमाणे मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी स्वत: दरेकर कुटुंबाला मदत केली आहे.

 

गरड व्हिडीओच्या माध्यमातून म्हाणाले होते, “१० कोटी रुपयांचं इंजेक्शन.एका लहानग्या जीवाला वाचवण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे.आपण दिलेला प्रत्येक छोटा-मोठा हातभार या बाळासाठी नवीन आयुष्य देऊ शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी सढळ हाताने मदत करा, आणि ज्यांना शक्य नाही, त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून योग्य वेळी मदत पोहोचू शकेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला काही कमी पडणार नाही” असं म्हणत त्यांनी विनंती केली होती.

संवेदनशील महाराष्ट्र, तब्बल ४ दिवसांत १० कोटी जमा

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या आवाहनाला संपूर्ण महाराष्ट्राने ज्या वेगाने प्रतिसाद दिला, तो मन हेलावून टाकणारा होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार अशा सर्वांनीच सढळ हाताने मदत केली आणि चमत्कार घडला. अवघ्या ४ दिवसांच्या आत १० कोटी रुपयांचा भलामोठा निधी पूर्ण झाला. ही केवळ पैशांची मदत नव्हती, तर महाराष्ट्रातील संवेदनशील आणि दानशूर लोकांच्या एकतेची मोठी ताकद होती.छोट्या-छोट्या मदतीतून उभा राहिलेला हा मोठा आधार आज एका जीवासाठी आशेचा किरण ठरला आहे.

खरंच,आपल्या महाराष्ट्रातील लोक किती दयाळू आणि दानशूर आहेत, याचं हे एक सुंदर उदाहरण आणि आदर्श सर्वांसमोर उभा राहिला आहे. हृदयच्या कुटुंबाने सर्व महाराष्ट्राचे , मदत करणाऱ्या हातांचे मनापासून आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by BEED 📍 (@beed.leader)

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका

दरम्यान या व्हिडीओनंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवरही टीका केली आहे. सोशल मीडियावर नागरिकांमधून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.अशा दुर्मिळ आणि प्राणघातक आजारांसाठी सामान्य कुटुंबांना दरवेळी सोशल मीडिया किंवा क्राउडफंडिंगवरच अवलंबून राहावे लागणार का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.केंद्र आणि राज्य सरकारने अशा आजारांच्या उपचारासाठी, इंजेक्शनवरील करमाफीसाठी आणि रुग्णांना वेळेत आर्थिक मदत देण्यासाठी ठोस धोरण व विशेष वैद्यकीय निधीची तरतूद करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांनी केली आहे.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरलेत आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषणाचा २…

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपावण्यात आला आहे. त्यानंतर दिशाच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हायकोर्टाचे आभार मानले आहेत. तर वकील निलेश ओझा यांनी प्रतिक्रिया देत सीबीआयचा तपास…

    Leave a Reply

    You Missed

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

    पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

    गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

    गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

    १ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?

    १ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?