सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

देवनार पशुवधगृहातील व्यवस्थेचा कॉंग्रेस लोकप्रतिनिधींकडून आढावा

देवनार पशुवधगृहात सुविधांचा अभाव

मुंबई दि. ०२ जुन : येत्या शनिवारी येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने देवनार पशुवधगृहाच्या संपूर्ण व्यवस्थेचा आज आढावा घेतला.

यावेळी आमदार अस्लम शेख व खासदार वर्षाताई गायकवाड यांनी देवनार पशुवधगृहातील अव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पशुवधगृह व बकरा मंडईतील सुविधांसाठी येणारे २५ कोटी कोटी जातात कुठे..? असा प्रश्न उपस्थित करत सुविधांच्या नावाखाली फार मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप आमदार अस्लम शेख यांनी केला.

खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या, एवढी अव्यवस्था असताना देखील दरवर्षी त्याच कंत्राटदाराला काम दिले जाते. २५ कोटी खर्च करुन अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज असे केंद्र देखील सरकार बांधू शकले नाही.

मंडई परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. त्याच घाणीमध्ये बसून लोकांना जेवावं लागत आहे. पार्किंगची व्यवस्था नाही. शौचालयांची व्यवस्था नाही. या सर्व अनागोंदी कारभाराबाबत आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत, असं वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी आमदार अमीन पटेल, ज्योती गायकवाड हे देखील उपस्थित होते.

  • Related Posts

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    राजधानी मुंबईत आज सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून मुंबई पुन्हा एकदा ‘तुंबई’ बनल्याचं चित्र आहे. पावसाचा सर्वाधिक फटका…

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    राज्यात विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आढावा घेत असून संपूर्ण प्रशासनाला ‘अलर्ट मोड’वर राहण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांमध्ये तत्काळ पंचनामे करण्याचे…

    Leave a Reply

    You Missed

    सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

    सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

    जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

    जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण