पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

लातूरमधील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना प्रशासनाकडून मिळालेला बैल व गावकरी

    लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी गावातील एका गरीब शेतकऱ्याची व्यथा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. काशिनाथ गायकवाड हे भूमिहीन शेतमजूर बटईने शेती करून आपल्या सहा मुलांचा उदरनिर्वाह करतात.

काही दिवसांपूर्वी वळवाच्या पावसादरम्यान वीज पडून त्यांच्या जोडीतील एका बैलाचा मृत्यू झाला. ऐन पेरणीच्या तोंडावर बैल गेल्याने गायकवाड कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने नवीन बैल खरेदी करणे किंवा भाड्याने आणणेही त्यांना शक्य नव्हते.

अखेर काशिनाथ गायकवाड यांच्या पत्नीने स्वतःच्या खांद्यावर जू घेत पतीसोबत नांगरणी करण्याचा निर्णय घेतला. हा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि तातडीने मदतीची घोषणा करण्यात आली.

मात्र, प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला बैल शेतातील कामासाठी योग्य नसल्याचे समोर आले आहे. शेतकरी कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, हा बैल नांगरणीसाठी सहकार्य करत नसून शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे सरकारी मदतीनंतरही गायकवाड कुटुंबाचे संकट कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

एकीकडे पेरणीचा हंगाम सुरू असताना दुसरीकडे शेतीसाठी आवश्यक असलेले जनावरच कामाला तयार नसल्याने या शेतकरी कुटुंबाची चिंता वाढली आहे. आता प्रशासन या प्रकरणात योग्य आणि सक्षम मदत देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

palghar-red-alert-mumbai-heavy-rain-live-updates मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक मंदावली असून,…

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा; विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आता मकोका कारवाई

गर्भलिंग निदान करणाऱ्यांची आता खैर नाही; आरोग्यमंत्र्यांचा विधानसभेत कडक इशारा राज्यात काही ठिकाणी विनापरवाना IVF केंद्रे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. तसेच गर्भलिंग निदानासारखा बेकायदेशीर प्रकार अजूनही काही…

Leave a Reply

You Missed

भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा; विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आता मकोका कारवाई

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा; विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आता मकोका कारवाई

चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार