नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.

नीट पेपरफुटी मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशातील परीक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक,सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.याचसंदर्भातील माहिती मोदींनी त्यांच्या या व्हिडीओद्वारे दिलेली आहे. परीक्षेच्या व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी एक उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विशेष म्हणजे ही जबाबदारी त्यांनी नंदन नीलेकणी यांच्यावर सोपली आहे.
आता हे नंदन नीलेकणी नेमके कोण आहेत? त्यांनी याआधी नेमकं काय काय केललं आहे? याबद्दल अनेक चर्चा होताना दिसत आहे.

कोण आहेत नंदन नीलेकणी?

नंदन नीलेकणी हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत. त्यांना ‘आधार’ प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार म्हटले जाते. २ जून १९५५ रोजी बंगळूरु येथे जन्मलेले नंदन मोहनराव नीलेकणी हे भारतातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञान नेत्यांपैकी एक आहेत. बंगळूरुमध्ये जन्मलेल्या नीलेकणी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आणि १९७८ मध्ये मुंबईतील पटनी कॉम्प्युटर सिस्टीम्समध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

इन्फोसिसच्या स्थापनेत मोठा हातभार

१९८१ मध्ये, नंदन नीलेकणी यांनी नारायण मूर्ती आणि इतर पाच सहकाऱ्यांसोबत इन्फोसिसची स्थापना केली, जी पुढे भारतातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपन्यांपैकी एक बनली. २००२ मध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यापूर्वी नीलेकनी यांनी अनेक नेतृत्व पदे भूषवली होती. CEO म्हणून त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात, इन्फोसिसचा महसूल सहा पटीने वाढून जवळपास ३ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. २०१७ मध्ये माजी CEO विशाल सिक्का यांच्या निवृत्तीनंतर, नीलेकनी गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून इन्फोसिसमध्ये परतले.

UIDAI चे पहिले अध्यक्ष म्हणून काम पाहिलं

UIDAI चे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. नंदन नीलेकणी यांनी जगातील सर्वात मोठा बायोमेट्रिक ओळख कार्यक्रम असलेल्या आधारची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्यास मदत केली. आज,आधार हा भारताच्या डिजिटल प्रशासन परिसंस्थेचा कणा बनला असून,तो एक अब्जाहून अधिक लोकांना थेट लाभ हस्तांतरण, आर्थिक समावेशन आणि ओळख पडताळणीची सुविधा पुरवतो.


UPI च्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली

भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्यातही निलेकानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी अशा आराखड्याला प्रोत्साहन देण्यात मोलाचा वाटा उचलला, ज्यामुळे अखेरीस युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच ज्याला आपण आज ‘UPI’ म्हणतो त्याचा विकास झाला आणि देशभरातील डिजिटल पेमेंटमध्ये नवीन तंत्रज्ञान उदयास आलं.

काँग्रेसच्या तिकिटावर लढवली निवडणूक

2014 सालच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र पराभवानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहून तंत्रज्ञान, सार्वजनिक धोरण आणि सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित केले. समाजकार्यातही त्यांचे मोठे योगदान असून 2023 साली त्यांनी आयआयटी मुंबईला तब्बल 315 कोटी रुपयांची देणगी दिली होती. याआधीही त्यांनी 85 कोटी रुपयांची देणगी दिली होती.

निलेकानी त्यांची जबाबदारी कशी पार पाडणार?

नंदन नीलेकणी यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावरील मोठे डिजिटल प्रकल्प यशस्वीपणे राबवण्याचा अनुभव आहे. तांत्रिक ज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्य यामुळेच परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी सरकारने नंदन नीलेकणी यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता ते ही जबाबदारी कशी पार पाडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

धर्मेंद्र प्रधाननंतर नितीन गडकरी रडारवर का आहेत? राजीनाम्याची का होतेय मागणी?

कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाचे वाढती तीव्रता पाहता अखेर देशाचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला. अखेर आंदोलनापुढे त्यांना नाईलाजाने का…

आषाढी एकादशी निमित्त छावा संघटनेनं राबवलेला सेवा उपक्रम चर्चेत; सर्वच स्तरातून कौतुक

संपूर्ण महाराष्ट्रमध्ये छावा मराठा योद्धा संघटना सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असून दरवर्षी या संघटने कडून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. दिनांक 25 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्त…

Leave a Reply

You Missed

नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

धर्मेंद्र प्रधाननंतर नितीन गडकरी रडारवर का आहेत? राजीनाम्याची का होतेय मागणी?

धर्मेंद्र प्रधाननंतर नितीन गडकरी रडारवर का आहेत? राजीनाम्याची का होतेय मागणी?

आषाढी एकादशी निमित्त छावा संघटनेनं राबवलेला सेवा उपक्रम चर्चेत; सर्वच स्तरातून कौतुक

आषाढी एकादशी निमित्त छावा संघटनेनं राबवलेला सेवा उपक्रम चर्चेत; सर्वच स्तरातून कौतुक

ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; हातात तिरंगा अन् पोस्टर घेऊन सभा स्थळी हजारो Gen-Z ची गर्दी

ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; हातात तिरंगा अन् पोस्टर घेऊन सभा स्थळी हजारो Gen-Z ची गर्दी

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी कोण माहितीयेत?

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी कोण माहितीयेत?

CJP च्या आंदोलनाला यश! अखेर धर्मेंद्र प्रधानांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा, जंतर मंतरवर मोठा जल्लोष

CJP च्या आंदोलनाला यश! अखेर धर्मेंद्र प्रधानांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा, जंतर मंतरवर मोठा जल्लोष

अभिजीत दीपके तापाने फणफणले, टायफॉइडची लागण;जंतर-मंतर सोडलं, आंदोलनाची पुढची दिशा काय असणार?

अभिजीत दीपके तापाने फणफणले, टायफॉइडची लागण;जंतर-मंतर सोडलं, आंदोलनाची पुढची दिशा काय असणार?

धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर, CJP चा पुढचा प्लान हा असणार; आशुतोष रांकाने स्पष्टच सांगितलं

धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर, CJP चा पुढचा प्लान हा असणार; आशुतोष रांकाने स्पष्टच सांगितलं

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजू नका; आधी त्यांच्या न्यायासाठी उभे राहा!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजू नका; आधी त्यांच्या न्यायासाठी उभे राहा!