NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

नीट पेपरफुटी प्रकरणातील खटले जलद गतीने चालवण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाच्या पहिल्याच सुनावणीला पहिल्याच दिवशी फटका बसला आहे.नीट पेपर फुटी प्रकरणी सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्टही स्थापन केलं. मात्र सोमवारी पहिली सुनावणी होऊ शकली नाही. पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टच्या कामकाजाला फटका बसला. त्यामुळे सुनावणी ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली.या प्रकरणात सीबीआयचे वकील न्यायालयात हजर न राहिल्यामुळे हे सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे राऊझ एव्हेन्यू विशेष कोर्टाला सुनावणी ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलावी लागली आहे.

सीबीआयचे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत

विशेष न्यायमूर्ती अनु ग्रोवर बलिगा यांच्या फास्ट ट्रॅक कोर्टात नीट पेपर प्रकरणी अटक केलेल्या विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार होती. आरोपींचे वकील एपी सिंह हे न्यायालयात हजर होते. मात्र सीबीआयचे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत. कोर्टाने आदेश दिला की, या प्रकरणी तात्काळ सरकारी वकिलाची नियुक्ती करावी.

आरोपींना १० वर्षांच्या कारावासाची तरतूद

दिल्लीच्या राउज अवेन्यू कोर्टात या प्रकरणी पुढील सुनावणी ३ ऑगस्टला होणार आहे. पुढील सुनावणीत सरकारी वकील उपस्थित असावेत असं स्पष्ट शब्दात कोर्टानं बजावलंय. या न्यायालयात परीक्षांमधील अनियमितता आणि पेपरफुटी प्रकरणी सुनावणी होणार आहे.दरम्यान, सरकारने या कायद्यात सुधारणा करणारे विधेयकही संसदेत सादर केले असून, त्यामध्ये दंडाची रक्कम पाच पटीने वाढवण्यासह आरोपींना १० वर्षांच्या कारावासाची तरतूद केली आहे.

CBI च्या अनुपस्थितीमुळे फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का

NEET पेपरफुटी आणि परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर तब्बल दीड महिना विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं होतं.२३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी पेपरफुटी प्रकरणांचा लवकर निकाल लागावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची घोषणा केली होती.”ज्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला आहे, ते तुरुंगात सडत आहेत,” असे सांगत पीएम मोदींनी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कडक कायद्याची घोषणा केली होती. त्यानुसार सार्वजनिक परीक्षा कायदा,२०२४ अंतर्गत राऊझ एव्हेन्यू कोर्टात हे विशेष न्यायालय सुरू करण्यात आले आहे. मात्र, पहिल्याच दिवशी CBI च्या अनुपस्थितीमुळे या आश्वासनाला धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

    धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मोठा निर्णय…

    धर्मेंद्र प्रधाननंतर नितीन गडकरी रडारवर का आहेत? राजीनाम्याची का होतेय मागणी?

    कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाचे वाढती तीव्रता पाहता अखेर देशाचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला. अखेर आंदोलनापुढे त्यांना नाईलाजाने का…

    Leave a Reply

    You Missed

    NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

    NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

    अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार

    अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार

    भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास;भारतासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट, पंतप्रधानांनीही केल अभिनंदन

    भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास;भारतासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट, पंतप्रधानांनीही केल अभिनंदन

    नागपूरमध्ये वाढता गँगवॉर; मित्रानेच केला घात, आधी इन्स्टाग्रामवर मैत्री केली अन् नंतर घाटावर बोलावून केली हत्या

    नागपूरमध्ये वाढता गँगवॉर; मित्रानेच केला घात, आधी इन्स्टाग्रामवर मैत्री केली अन् नंतर घाटावर बोलावून केली हत्या

    नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

    नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

    धर्मेंद्र प्रधाननंतर नितीन गडकरी रडारवर का आहेत? राजीनाम्याची का होतेय मागणी?

    धर्मेंद्र प्रधाननंतर नितीन गडकरी रडारवर का आहेत? राजीनाम्याची का होतेय मागणी?

    आषाढी एकादशी निमित्त छावा संघटनेनं राबवलेला सेवा उपक्रम चर्चेत; सर्वच स्तरातून कौतुक

    आषाढी एकादशी निमित्त छावा संघटनेनं राबवलेला सेवा उपक्रम चर्चेत; सर्वच स्तरातून कौतुक

    ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; हातात तिरंगा अन् पोस्टर घेऊन सभा स्थळी हजारो Gen-Z ची गर्दी

    ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; हातात तिरंगा अन् पोस्टर घेऊन सभा स्थळी हजारो Gen-Z ची गर्दी

    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी कोण माहितीयेत?

    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी कोण माहितीयेत?