आषाढी वारीचे औचित्य साधून ‘साहित्यसंपदा’तर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील विविध भागांतून आणि सामाजिक स्तरामधून या स्पर्धेला साहित्यिकांचा व लेखकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा निकाल घोषित करताना साहित्यसंपदाचे संस्थापक वैभव धनावडे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे मनापासून आभार मानले.
या स्पर्धेत लेखकांनी आपल्या उत्कृष्ट रचना सादर केल्या. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे:
कै.शशिकांत पुराणिक स्मृती प्रित्यर्थ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत…
प्रथम क्रमांक: अरुण द.म्हात्रे
द्वितीय क्रमांक: अनिता गुजर
तृतीय क्रमांक: हेमा जाधव
उत्तेजनार्थ: राजेश्वरी अंबिके आणि माधुरी इनामदार
कै.अनंत महादेव शेडे स्मृती प्रित्यर्थ पुरस्काराची घोषणा कार्यवाहक वैशाली कदम व कार्याध्यक्ष मयूर पालकर यांनी केली आहे. हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले पुरस्काराचे मानकरी आहेत,
प्रथम क्रमांक: कविता झुंजारराव
द्वितीय क्रमांक: सुचित्रा कुंचमवार
तृतीय क्रमांक: चंदा वाडकर
उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात आला.या पुरस्काराची मानकरी ठरल्या आहेत दीपा वणकुद्रे आणि करुणा शिंदे
तसेच स्पर्धेस लाभलेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन आयोजकांतर्फे काही विशेष पारितोषिकांची घोषणा करण्यात आली त्या अंतर्गत कै.मनोहर नेवगी स्मृती प्रित्यर्थ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
प्रथम क्रमांक: वर्षा वराडे फटकाळे
द्वितीय क्रमांक: माधुरी बर्वे
तृतीय क्रमांक: देवयानी म्हंकाळे
उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात आला.या पुरस्काराची मानकरी ठरली आहे अर्चना माने आणि संध्या यावडकर.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांना आयोजकांतर्फे रोख रक्कम आणि डिजिटल सन्मानपत्र
दरम्यान या स्पर्धेत अर्चना गोरे यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.तर अपेक्षा बिडकर आणि स्मिता पेशवे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. परीक्षकांनी सहभागी स्पर्धकांच्या उत्कृष्ट लेखन शैलीचे मनापासून कौतुक केले. “अशा प्रकारच्या साहित्य स्पर्धांमुळे समाजात सकारात्मकता आणि सृजनशील समाज निर्मितीस मोठा हातभार लागतो,” असे मत परीक्षकांनी व्यक्त केले. तसेच स्पर्धेतील सर्व विजेत्यांना आयोजकांतर्फे रोख रक्कम आणि डिजिटल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.








