मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर; तर, वर्सोवामध्ये ३८.५१ अन् अंधेरी पश्चिममध्ये ३६.४६

मुंबई उपनगर जिल्ह्यातील पश्चिम उपनगरांमध्ये पार पडलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण म्हणजे SIR प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पश्चिम उपनगरातील १५ विधानसभा मतदारसंघांमधील एकूण ४५ लाख ७२ हजार ३७८ नोंदणीकृत मतदारांपैकी तब्बल १५ लाख ६८ हजार मतदारांची पडताळणी होऊ शकलेली नाही. केवळ ३० लाख ३७ हजार ५०७ मतदारांची पडताळणी पूर्ण झाली असून, उर्वरित मतदार बेपत्ता, निधन झालेले किंवा स्थलांतरित झाल्यामुळे ‘अन-कलेक्टेबल’ यादीत गेले आहेत. या निष्पन्नतेमुळे तब्बल सात मतदारसंघांतील लाखो मतदार मतदारयादीतून बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वर्सोवात ३८.५१, वांद्रे पश्चिम ३७.९९,मतदार पडताळणीबाहेर

मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर आहेत. त्यानंतर वर्सोवा ३८.५१, वांद्रे पश्चिम ३७.९९, गोरेगाव ३६.४७, अंधेरी पश्चिम ३६.४६, दिंडोशी ३५.४७, वांद्रे पूर्व ३४.४७, कांदिवली पूर्व ३३.६९, चारकोप ३२.९१, विलेपार्ले ३१.६३, अंधेरी पूर्व ३१.३५, जोगेश्वरी पूर्व ३०.०८, मागाठाणे ३०.४७ व दहिसरमध्ये २९.३८ टक्के मतदारांचा नोंदणी प्रक्रियेदरम्यान संपर्क झाला नाही. दुसरीकडे बोरीवलीमध्ये सर्वात कमी म्हणजे २५.६२ टक्के मतदार सापडले नाहीत. त्यामुळे हे मतदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

वर्सोव्यात मताधिक्याच्या ७१ पट मतदार बाहेर

वर्सोवा मतदारसंघात एक लाख १४ हजार मतदार पडताळणीबाहेर आहेत. विजयी उमेदवाराला अवघे १,६०० मताधिक्य मिळाले होते. त्या तुलनेत पडताळणी बाहेरील मतदारांची संख्या त्यांच्या विजयाच्या मताधिक्याच्या ७१.२५ पट आहे.

जोगेश्वरी पूर्वमध्ये १,५४१ मतांच्या मताधिक्याच्या तुलनेत ९१ हजार ४३७ मतदार पडताळणीबाहेर आहेत. हे प्रमाण ५९.३६ पट आहे.
मालाड पश्चिममध्ये हे प्रमाण २२.७६ पट, दिंडोशीत १८.२४ पट, वांद्रे पूर्वमध्ये ७.६९ पट, अंधेरी पश्चिममध्ये ५.४२ पट आणि वांद्रे पश्चिममध्ये ५.५६ पट आहे. याउलट बोरीवलीत पडताळणीबाहेरील मतदारांची संख्या विजयी उमेदवाराच्या मताधिक्याच्या ०.८५ पट इतकी आहे.

तिप्पट मतदार गेले कुठे?

पश्चिम उपनगरातील १५ मतदारसंघांतील विजयी उमेदवारांच्या मताधिक्यांची एकत्रित बेरीज पाच लाख ४७ हजार ९६३ आहे.
पडताळणी न झालेल्या मतदारांची संख्या तब्बल १५ लाख ३४ हजार ८७१ आहे. म्हणजेच पडताळणीबाहेरील मतदारांची संख्या एकत्रित मताधिक्याच्या सुमारे तिप्पट असल्याचे आढळून आले आहे.

लाखभर मतदार अद्याप पडताळणीबाहेर

मालाड पश्चिमेतील १,४१,६६७, गोरेगावमधील १,२२,९६४, दिंडोशी येथील १,१२,८०८, वर्सोव्यातील १,१४,०००, वांद्रे पश्चिमेतील १,१०,७८१, चारकोपचे १,०६,९५०, अंधेरी पश्चिम येथील १,०६,१७२ मतदार पडताळणीबाहेर आहेत.

मालाड पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक मतदार पडताळणीबाहेर राहिल्याचे स्पष्ट झालं आहे. तर बोरीवलीत हे प्रमाण सर्वात कमी आहे.

 

 

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    खारघरमधील धक्कादायक प्रकार, झेरॉक्स सेंटरमध्ये सापडले ३,४०० SIR मतदार अर्ज; ५ बीएलओ निलंबित

    नवी मुंबईतील एका फोटोकॉपीच्या दुकानात मतदार यादीच्या विशेष सखोल सुधारणेशी संबंधित ३,४०० गणना अर्ज सापडल्यानंतर पाच बूथ स्तर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या घटनेमुळे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला.…

    १ सप्टेंबरला कुक्कुटपालकांचा एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचा पुण्यात भव्य मोर्चा

    महाराष्ट्रातील कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री व्यवसायाला सध्या वाढता उत्पादन खर्च, कंपन्यांकडून मिळणारा अपुरा मोबदला आणि करारांमधील असमान अटींमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. शासनाने कुक्कुटपालकांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी…

    Leave a Reply

    You Missed

    नेपाळमधील विध्वंसक प्रलय! देवीघाट प्रकल्प बाधित, जलविद्युत प्रकल्पांत ५०० जण अडकले तर, भारताला होणारा वीजपुरवठा निम्म्यावर

    नेपाळमधील विध्वंसक प्रलय! देवीघाट प्रकल्प बाधित, जलविद्युत प्रकल्पांत ५०० जण अडकले तर, भारताला होणारा वीजपुरवठा निम्म्यावर

    मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर; तर, वर्सोवामध्ये ३८.५१ अन् अंधेरी पश्चिममध्ये ३६.४६

    मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर; तर, वर्सोवामध्ये ३८.५१ अन् अंधेरी पश्चिममध्ये ३६.४६

    खारघरमधील धक्कादायक प्रकार, झेरॉक्स सेंटरमध्ये सापडले ३,४०० SIR मतदार अर्ज; ५ बीएलओ निलंबित

    खारघरमधील धक्कादायक प्रकार, झेरॉक्स सेंटरमध्ये सापडले ३,४०० SIR मतदार अर्ज; ५ बीएलओ निलंबित

    १ सप्टेंबरला कुक्कुटपालकांचा एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचा पुण्यात भव्य मोर्चा

    १ सप्टेंबरला कुक्कुटपालकांचा एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचा पुण्यात भव्य मोर्चा

    मढमध्ये पथदिव्यांच्या अभावामुळे भीषण दुर्घटना; म्हशीच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, जबाबदार कोण?

    मढमध्ये पथदिव्यांच्या अभावामुळे भीषण दुर्घटना; म्हशीच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, जबाबदार कोण?

    SIR अर्जांचा काळाबाजार? चक्क झेरॉक्स दुकानात भाजप कार्यकर्त्याकडे ५०० ते १००० SIRचे ओरिजनल फॉर्म मिळाल्याचा दावा; निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह

    SIR अर्जांचा काळाबाजार? चक्क झेरॉक्स दुकानात भाजप कार्यकर्त्याकडे ५०० ते १००० SIRचे ओरिजनल फॉर्म मिळाल्याचा दावा; निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह

    अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

    अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

    सुभाष चंद्र यांना मोठा दिलासा! २२,००६ कोटींचे कर्ज अन् ६.५ कोटींची सेटलमेंट; NCLT चे शिक्कामोर्तब

    सुभाष चंद्र यांना मोठा दिलासा! २२,००६ कोटींचे कर्ज अन् ६.५ कोटींची सेटलमेंट; NCLT चे शिक्कामोर्तब

    नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरात १६५ जणांचा मृत्यू; १४२ भारतीयांसह शेकडो विदेशी नागरिकही बेपत्ता

    नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरात १६५ जणांचा मृत्यू; १४२ भारतीयांसह शेकडो विदेशी नागरिकही बेपत्ता