नेपाळमधील विध्वंसक प्रलय! देवीघाट प्रकल्प बाधित, जलविद्युत प्रकल्पांत ५०० जण अडकले तर, भारताला होणारा वीजपुरवठा निम्म्यावर

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाच्या महाप्रलयाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, नेपाळच्या ‘राष्ट्रीय आपत्ती धोका निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने’ (NDRRMA) पुन्हा एकदा मोठ्या महापुराचा इशारा दिला आहे. दरम्यान नेपाळमधील ५७९ आणि तिबेटमधील पाच मृतांसह प्रलयबळींची संख्या शुक्रवारी ५८४वर पोहोचली असून, १९२४ जण अद्याप बेपत्ता आहेत.

 सहा मोठ्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० जण अडकले

पूर आणि चिखलाच्या समस्येमुळे रसुवा जिल्ह्यातील तब्बल सहा मोठ्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक नागरिक आणि कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथकाचे मुख्य लक्ष अप्पर त्रिशुली, अप्पर त्रिशुली-१, रसुवा, त्रिशुली ३-ए, चिलिमे खोला आणि लांगटांग या प्रकल्पांवर केंद्रित आहे. त्रिशुली ३-ए प्रकल्पाच्या बोगद्याच्या तोंडाशी तुंबलेला प्रचंड चिखल व दगड बाजूला करण्यासाठी नेपाळ सैन्याकडून ड्रिलिंग मशिनचा वापर केला जात आहे.

लोकांचा शोध घेण्यासाठी हाय-टेक ड्रोन वापरले जात आहेत

इतिहासातील सर्वात कठीण बचाव मोहीमअत्यंत प्रतिकूल हवामान आणि उद्ध्वस्त झालेले रस्ते या आव्हानांचा सामना करत यात लष्कराचे ७,००० आणि NAPF चे ४,००० जवान तैनात करण्यात आले आहेत. हे जवान यांची संयुक्त पथके बचावकार्यात उतरले आहेत. अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी हाय-टेक ड्रोन वापरले जात आहेत. रसुवा येथील धुंचेपर्यंतचा मार्ग चारचाकी वाहनांसाठी मोकळा करण्यात आला असून पाऊस उघडताच हेलिकॉप्टर व अन्य यंत्रणांच्या माध्यमातून मोहिमेला गती दिली जात आहे.एनएपीएफचे प्रवक्ते आणि डीआयजी नेत्रबहादूर कार्की यांनी दिलेल्या माहितीनुसार,

दरम्यान, नेपाळ सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल राजाराम बसनेत यांनी सांगितले की, त्रिशुली ३-ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात जमा झालेला चिखल आणि दगड बाजूला करून मार्ग तयार करण्यासाठी ड्रिलिंग मशीनचा वापर केला जात आहे.

नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बाधित जलविद्युत् प्रकल्पांचा भारताला मोठा फटका

तसेच नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे जलविद्युत् प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे.यामुळे भारतालाही मोठी अडचण निर्माण झाली आहे. भारताला वीजपुरवठा करणारा १४ मेगावॅट क्षमतेचा देवीघाट जलविद्युत् प्रकल्पही पुरामुळे प्रभावित झाला आहे. यामुळे नेपाळने भारताला होणारा वीजपुरवठा सुमारे ८०० मेगावॅटवरून निम्म्यावर म्हणजे किमान ४०० मेगावॅटपर्यंत अल्प केला आहे. नेपाळच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे देशातील सुमारे १३ जलविद्युत् प्रकल्प आणि एका सौर प्रकल्प यांची हानी झाली आहे. या पुराचा फटका जवळपास ३५९ मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती प्रकल्पांना बसला असून यातील बहुतांश प्रकल्प जलविद्युत् आहेत.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सुभाष चंद्र यांना मोठा दिलासा! २२,००६ कोटींचे कर्ज अन् ६.५ कोटींची सेटलमेंट; NCLT चे शिक्कामोर्तब

    NCLT ने झी ग्रुपचे Zee Group संस्थापक आणि मिडिया उद्योगपती सुभाष चंद्र यांना वैयक्तिक दिवाळखोरी प्रकरणातून मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीएलटीने सुमारे २,२०,०६.५७ कोटी रुपयांच्या कर्जाचे निराकरण करण्यासाठी अवघ्या ६.५…

    नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरात १६५ जणांचा मृत्यू; १४२ भारतीयांसह शेकडो विदेशी नागरिकही बेपत्ता

    नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात झालेल्या मुसळधार पावसानंतर आलेल्या महाप्रलयाने भीषण हाहाकार माजवला आहे. अचानक आलेल्या या महापुरामुळे दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागातील हजारो लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून भीषण विनाशाची…

    Leave a Reply

    You Missed

    नेपाळमधील विध्वंसक प्रलय! देवीघाट प्रकल्प बाधित, जलविद्युत प्रकल्पांत ५०० जण अडकले तर, भारताला होणारा वीजपुरवठा निम्म्यावर

    नेपाळमधील विध्वंसक प्रलय! देवीघाट प्रकल्प बाधित, जलविद्युत प्रकल्पांत ५०० जण अडकले तर, भारताला होणारा वीजपुरवठा निम्म्यावर

    मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर; तर, वर्सोवामध्ये ३८.५१ अन् अंधेरी पश्चिममध्ये ३६.४६

    मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर; तर, वर्सोवामध्ये ३८.५१ अन् अंधेरी पश्चिममध्ये ३६.४६

    खारघरमधील धक्कादायक प्रकार, झेरॉक्स सेंटरमध्ये सापडले ३,४०० SIR मतदार अर्ज; ५ बीएलओ निलंबित

    खारघरमधील धक्कादायक प्रकार, झेरॉक्स सेंटरमध्ये सापडले ३,४०० SIR मतदार अर्ज; ५ बीएलओ निलंबित

    १ सप्टेंबरला कुक्कुटपालकांचा एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचा पुण्यात भव्य मोर्चा

    १ सप्टेंबरला कुक्कुटपालकांचा एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचा पुण्यात भव्य मोर्चा

    मढमध्ये पथदिव्यांच्या अभावामुळे भीषण दुर्घटना; म्हशीच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, जबाबदार कोण?

    मढमध्ये पथदिव्यांच्या अभावामुळे भीषण दुर्घटना; म्हशीच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, जबाबदार कोण?

    SIR अर्जांचा काळाबाजार? चक्क झेरॉक्स दुकानात भाजप कार्यकर्त्याकडे ५०० ते १००० SIRचे ओरिजनल फॉर्म मिळाल्याचा दावा; निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह

    SIR अर्जांचा काळाबाजार? चक्क झेरॉक्स दुकानात भाजप कार्यकर्त्याकडे ५०० ते १००० SIRचे ओरिजनल फॉर्म मिळाल्याचा दावा; निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह

    अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

    अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

    सुभाष चंद्र यांना मोठा दिलासा! २२,००६ कोटींचे कर्ज अन् ६.५ कोटींची सेटलमेंट; NCLT चे शिक्कामोर्तब

    सुभाष चंद्र यांना मोठा दिलासा! २२,००६ कोटींचे कर्ज अन् ६.५ कोटींची सेटलमेंट; NCLT चे शिक्कामोर्तब

    नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरात १६५ जणांचा मृत्यू; १४२ भारतीयांसह शेकडो विदेशी नागरिकही बेपत्ता

    नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरात १६५ जणांचा मृत्यू; १४२ भारतीयांसह शेकडो विदेशी नागरिकही बेपत्ता