नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाच्या महाप्रलयाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, नेपाळच्या ‘राष्ट्रीय आपत्ती धोका निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने’ (NDRRMA) पुन्हा एकदा मोठ्या महापुराचा इशारा दिला आहे. दरम्यान नेपाळमधील ५७९ आणि तिबेटमधील पाच मृतांसह प्रलयबळींची संख्या शुक्रवारी ५८४वर पोहोचली असून, १९२४ जण अद्याप बेपत्ता आहेत.
सहा मोठ्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० जण अडकले
पूर आणि चिखलाच्या समस्येमुळे रसुवा जिल्ह्यातील तब्बल सहा मोठ्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक नागरिक आणि कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथकाचे मुख्य लक्ष अप्पर त्रिशुली, अप्पर त्रिशुली-१, रसुवा, त्रिशुली ३-ए, चिलिमे खोला आणि लांगटांग या प्रकल्पांवर केंद्रित आहे. त्रिशुली ३-ए प्रकल्पाच्या बोगद्याच्या तोंडाशी तुंबलेला प्रचंड चिखल व दगड बाजूला करण्यासाठी नेपाळ सैन्याकडून ड्रिलिंग मशिनचा वापर केला जात आहे.
लोकांचा शोध घेण्यासाठी हाय-टेक ड्रोन वापरले जात आहेत
इतिहासातील सर्वात कठीण बचाव मोहीमअत्यंत प्रतिकूल हवामान आणि उद्ध्वस्त झालेले रस्ते या आव्हानांचा सामना करत यात लष्कराचे ७,००० आणि NAPF चे ४,००० जवान तैनात करण्यात आले आहेत. हे जवान यांची संयुक्त पथके बचावकार्यात उतरले आहेत. अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी हाय-टेक ड्रोन वापरले जात आहेत. रसुवा येथील धुंचेपर्यंतचा मार्ग चारचाकी वाहनांसाठी मोकळा करण्यात आला असून पाऊस उघडताच हेलिकॉप्टर व अन्य यंत्रणांच्या माध्यमातून मोहिमेला गती दिली जात आहे.एनएपीएफचे प्रवक्ते आणि डीआयजी नेत्रबहादूर कार्की यांनी दिलेल्या माहितीनुसार,
दरम्यान, नेपाळ सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल राजाराम बसनेत यांनी सांगितले की, त्रिशुली ३-ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात जमा झालेला चिखल आणि दगड बाजूला करून मार्ग तयार करण्यासाठी ड्रिलिंग मशीनचा वापर केला जात आहे.
नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बाधित जलविद्युत् प्रकल्पांचा भारताला मोठा फटका
तसेच नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे जलविद्युत् प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे.यामुळे भारतालाही मोठी अडचण निर्माण झाली आहे. भारताला वीजपुरवठा करणारा १४ मेगावॅट क्षमतेचा देवीघाट जलविद्युत् प्रकल्पही पुरामुळे प्रभावित झाला आहे. यामुळे नेपाळने भारताला होणारा वीजपुरवठा सुमारे ८०० मेगावॅटवरून निम्म्यावर म्हणजे किमान ४०० मेगावॅटपर्यंत अल्प केला आहे. नेपाळच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे देशातील सुमारे १३ जलविद्युत् प्रकल्प आणि एका सौर प्रकल्प यांची हानी झाली आहे. या पुराचा फटका जवळपास ३५९ मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती प्रकल्पांना बसला असून यातील बहुतांश प्रकल्प जलविद्युत् आहेत.








