नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात झालेल्या मुसळधार पावसानंतर आलेल्या महाप्रलयाने भीषण हाहाकार माजवला आहे. अचानक आलेल्या या महापुरामुळे दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागातील हजारो लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून भीषण विनाशाची विदारक दृश्ये आता समोर येऊ लागली आहेत.
१६५ लोकांचा मृत्यू
नेपाळ आणि तिबेटच्या हिमालयीन सीमावर्ती भागात आलेल्या अचानक पुरामुळे कमीत कमी १६५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर पर्यटकांसह शेकडो लोक बेपत्ता आहेत. तसेच भारतातही काही ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला आहे. भीषण पुरामुळे झालेल्या विनाशाची विदारक दृश्य आता समोर येऊ लागली आहेत. चीन आणि नेपाळ दरम्यान वाहणाऱ्या ल्हेन्डे नदीच्या काठावरून माती आणि ढिगाऱ्याचा एक भलामोठा तुकडा कोसळल्याने ही विनाशकारी पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भोटेकोशी नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक मोठी वाढ झाली आणि नदीला भीषण पूर आला. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे नदीकाठची अनेक गावे, रस्ते, घरे, पूल आणि जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.
भयानक परिस्थिती, शेकडो नागरिक बेपत्ता, भारतीयांचाही समावेश
नेपाळमधील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महापूरात आतापर्यंत कमीत कमी १६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव पथकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४२ भारतीय नागरिकांसह एकूण ४०३ हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता पर्यटकांमध्ये ऑस्ट्रेलियन, ब्रिटिश, मलेशियन, डच, पोर्तुगीज, दक्षिण आफ्रिकन, दक्षिण कोरियन आणि अमेरिकन नागरिकांचा समावेश असल्याचे नेपाळ पर्यटन मंडळाने स्पष्ट केले आहे.
🚨 Nepal’s devastating floods are a warning the world cannot ignore.#WATCH Aerial footage shows the horrific aftermath as entire roads, bridges and buildings have been swallowed by floodwaters.
At least 97 people have been killed, while 403 people from 27 countries remain… pic.twitter.com/TAZ3cAtQRR
— War Updates FC (@k_c_shivansh) August 26, 2026
पुरामुळे गावांमध्ये माती आणि चिखल, नेपाळी लष्कराकडून विमानांद्वारे बचाव कार्य
नेपाळमधील मदत व बचाव कार्यादरम्यान घेण्यात आलेल्या हवाई चित्रफितीमध्ये पुरामुळे गावांमध्ये माती आणि चिखल पसरल्याचे दिसत आहे. नेपाळी लष्कराकडून विमानांद्वारे बचाव कार्य सुरू असून शेकडो लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे, तर धोकादायक क्षेत्रात नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात गेलेल्या बहुमजली इमारतींमधून बचाव पथकांनी चिखल आणि गाळातून वाट काढत शोधमोहीम राबवली जात आहे.
तिबेटमध्ये दरड कोसळून दुर्घटना
तिबेटच्या सीमावर्ती भागातील ग्यारोंग येथे दरड कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. चिनी सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून २६५ जण बेपत्ता आहेत. सीमेवरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये माती आणि चिखलाची एक अवाढव्य लाट बहुमजली इमारतीवर कोसळताना कैद झाली आहे. खाली जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेले लोक आणि पाण्याच्या तडाख्यात बस व कार यासारखी वाहने खेळण्यासारखी सहज वाहून जाताना दिसत आहेत.
पूराची भयावह दृश्य समोर
नेपाळमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी १६२ जणांचा मृत्यू झाला असून, १४२ भारतीय नागरिकांसह ४०३ लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या इतरांमध्ये ऑस्ट्रेलियन, ब्रिटिश, मलेशियन, डच, पोर्तुगीज, दक्षिण आफ्रिकन, दक्षिण कोरियन आणि अमेरिकन नागरिकांचा समावेश असल्याचे नेपाळ पर्यटन मंडळाने म्हटले आहे.
नेपाल में आए जलप्रलय ने काफ़ी तबाही मचाई हुई हैं जिससे कई लोग लापता हो गए तो कई लोगों के घर तबाह हो गए हैं।
प्रकृति सबकी रक्षा करे🙏#Flooddisaster #NDRF#NepaliArmy#Nepal#NepalFlood#Nepal pic.twitter.com/AwG9TWCjZ9
— 🕊️ Er. albatross🕊️ (@Albatross7817) August 26, 2026
३ जणांचा मृत्यू तर, इतर २६५ जण बेपत्ता
तिबेटच्या सीमावर्ती भागातील ग्यारोंग येथे दरड कोसळल्यामुळे जीवितहानी झाल्याचे चिनी सरकारी माध्यमांनी वृत्त दिले आहे. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून इतर २६५ जण बेपत्ता आहेत. तिबेटकडील सीमेवरील सीसीटीव्हीच्या एका भयावह दृश्यात, माती आणि ढिगाऱ्याची एक अवाढव्य लाट बहुमजली इमारतीवर कोसळताना दिसत आहे. खाली जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेले लोक दिसत असून, पाण्याच्या तडाख्यात बस व कार यासारखी वाहने खेळण्यासारखी सहज वाहून गेल्याचे दिसत आहे.
बाढी प्रभावितहरूको उद्धारमा #नेपालीसेना….
जहाँ संकट, त्यहाँ #नेपालीसेना !!!#NepaliArmy#BhoteKoshiFlood pic.twitter.com/roAhhUGMNt— Nepali Army (@NepaliArmyHQ) August 27, 2026
घरे वाहून जाताना दिसत आहेत
नेपाळी पोलिसांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये पुराचे पाणी नदीतून वेगाने वाहताना आणि घरे वाहून जाताना दिसत आहेत. दक्षिण आशियामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या मान्सूनच्या पावसामुळे दरवर्षी पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडतात, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या विनाशाचे दृश्य दाखवणारे उपग्रह फोटो प्लॅनेट लॅब्सने प्रसिद्ध केले आहेत.
भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सतर्कतेचा इशारा
नेपाळमधील पुराची भीषणता आणि नद्यांची वाढती पातळी पाहता भारतातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा (Alert) देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार प्रशासनाने नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे निर्देश दिले आहेत.








