भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन आशियाई देशांमध्ये सुरु असलेल्या तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीवर आता मोठा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक मोठा दावा करत, “भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे,” असे जाहीर केले.

ट्रम्प यांचा दावा आणि अमेरिकेची मध्यस्थी

ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, “अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशांमध्ये दीर्घ चर्चा झाली. या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा सामंजस्यपणा आणि संयम कौतुकास्पद आहे.”

भारताची अधिकृत प्रतिक्रिया

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले की, “पाकिस्तानच्या डीजीएमओंचा भारताच्या डीजीएमओंना 15.35 वाजता फोन आला. त्यानुसार, आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही बाजूंनी फायरिंग, लष्करी कारवाया आणि हवाई तसेच सागरी मोहिमा थांबवल्या जातील.” त्यांनी हेही स्पष्ट केलं की, 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा डीजीएमओ स्तरावर चर्चा होणार आहे.

पाकिस्तानकडूनही दुजोरा

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी देखील युद्धबंदीची पुष्टी केली. ते म्हणाले, “पाकिस्तानने नेहमीच शांतता आणि स्थिरतेसाठी प्रयत्न केले आहेत. आमचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता आम्ही या युद्धबंदीला पाठिंबा दिला आहे.”

दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव शिगेला

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत, 7 मेच्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केले. या कारवाईत अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलं.

भारताचा कठोर इशारा कायम

भारताने स्पष्टपणे म्हटलं आहे की, भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला “भारताविरुद्ध युद्ध” समजून त्याला तात्काळ आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल. या भूमिकेमुळे परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.

सध्या युद्धबंदीवर सहमती मिळाल्याचं चित्र असलं तरी, दोन्ही देशांमध्ये अजूनही अविश्वासाचं वातावरण आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने मिळालेली ही शस्त्रसंधी किती काळ टिकेल, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे.

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशासनात मोठा बदल करत २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. या बदल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या…

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

    सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी Meta Platforms ला अमेरिकेत मोठा धक्का बसला आहे. New Mexico येथील न्यायालयाने कंपनीवर तब्बल 375 मिलियन डॉलर (सुमारे 3100 कोटी रुपये) इतका दंड ठोठावला आहे.…

    Leave a Reply

    You Missed

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    • By Admin
    • April 22, 2026
    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड