सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर; लग्नासाठी मुली असल्याचे सांगून तरुणांची फसवणूक

महाराष्ट्रासह देशभरात ‘अनाथांची माय’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा वापर करून तरुणांना फसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नासाठी मुली आहेत असे सांगून अनेक इच्छुक तरुणांकडून रजिस्ट्रेशनच्या नावाखाली 15,000 रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या संपूर्ण फसवणुकीचा पर्दाफाश झाल्यानंतर सिंधुताईंच्या संस्थेने सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रारंभी पोलीस दुर्लक्ष करत असल्याचं चित्र होतं, मात्र एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

कशा प्रकारे केली जात होती फसवणूक?

आरोपी व्यक्ती किंवा टोळी सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यातील संस्थेचा हवाला देऊन तरुणांना फोन करत होती. लग्नासाठी मुली आश्रमात आहेत, असं सांगून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशनसाठी PhonePe, Google Pay यांसारख्या डिजिटल माध्यमातून १५ हजार रुपये मागवले जात होते. विश्वासार्हता वाढवण्यासाठी सिंधुताईंचं नाव आणि पुण्यातील आश्रमाचा संदर्भ वापरला जात होता.

कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल?

सासवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी IPC 419(4), 418(4), 420(2) आणि आयटी ऍक्ट कलम 66 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू असून, या रॅकेटचा माग काढण्यासाठी सायबर क्राइम विभागाची मदत घेतली जात आहे.

समाजातील मुलांच्या लग्नाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मुलांच्या विवाहासाठी पालकांमध्ये असलेली अस्वस्थता आणि असुरक्षितता समोर आली आहे. समाजातील अनेक पालक, नातेवाईक मुलगी मिळावी म्हणून कोणतीही किंमत देण्यास तयार असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    दिशा सालियान प्रकरण! उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; तर पुरावे दडपल्याचा संशय, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चिमाजी आढावांचीही चौकशी

    बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते…

    अकोल्यात फर्निचरच्या कामाच्या बहाण्याने घरांमध्ये छुपे कॅमेरे; बेडरूम अन् बाथरूममधील महिलांचे खासगी क्षण रेकॉर्ड

    प्रवास करताना हॉटेलमध्ये कुठे राहण्याची व्यवस्था करत असून तेव्हा नक्कीच आपण सगळेचजण आधी पाहतो ती सुरक्षा. कुठे छुपे कॅमेरे वैगरे नाही ना याची दक्षता घेऊनच आपण तिथे राहतो. पण हा…

    Leave a Reply

    You Missed

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा