सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर; लग्नासाठी मुली असल्याचे सांगून तरुणांची फसवणूक

महाराष्ट्रासह देशभरात ‘अनाथांची माय’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा वापर करून तरुणांना फसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नासाठी मुली आहेत असे सांगून अनेक इच्छुक तरुणांकडून रजिस्ट्रेशनच्या नावाखाली 15,000 रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या संपूर्ण फसवणुकीचा पर्दाफाश झाल्यानंतर सिंधुताईंच्या संस्थेने सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रारंभी पोलीस दुर्लक्ष करत असल्याचं चित्र होतं, मात्र एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

कशा प्रकारे केली जात होती फसवणूक?

आरोपी व्यक्ती किंवा टोळी सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यातील संस्थेचा हवाला देऊन तरुणांना फोन करत होती. लग्नासाठी मुली आश्रमात आहेत, असं सांगून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशनसाठी PhonePe, Google Pay यांसारख्या डिजिटल माध्यमातून १५ हजार रुपये मागवले जात होते. विश्वासार्हता वाढवण्यासाठी सिंधुताईंचं नाव आणि पुण्यातील आश्रमाचा संदर्भ वापरला जात होता.

कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल?

सासवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी IPC 419(4), 418(4), 420(2) आणि आयटी ऍक्ट कलम 66 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू असून, या रॅकेटचा माग काढण्यासाठी सायबर क्राइम विभागाची मदत घेतली जात आहे.

समाजातील मुलांच्या लग्नाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मुलांच्या विवाहासाठी पालकांमध्ये असलेली अस्वस्थता आणि असुरक्षितता समोर आली आहे. समाजातील अनेक पालक, नातेवाईक मुलगी मिळावी म्हणून कोणतीही किंमत देण्यास तयार असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

    Watermelon death case:पायधुनीतील डोकाडिया कुटुंबाचा झालेला दुर्दैवी मृत्यू सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या शनिवारी रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्लेल्या या कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलींना अवघ्या काही तासांतच…

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई मंत्रालयात पुन्हा एकदा लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यावेळी अर्थ आणि नियोजन विभागातील अधिकारीच एसीबीच्या…

    Leave a Reply

    You Missed

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द