“श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव”
विराळ, ता. जळकोट, जि. लातूर येथे श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, मुलांना शैक्षणिक मदत देखील केली जाते. या कार्यातून अध्यक्ष नरसिंग सोनटक्के यांनी आदर्श शिक्षक व समाजसेवक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
श्री समर्थ सद्गुरु धोंडू तात्या महाराज यांच्या 94 व्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्या अंतर्गत आज, शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता विराळ येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात वैद्यकीय, अभियांत्रिकी, शैक्षणिक, सामाजिक, कृषी, पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा
“गौरव कार्याचा – सन्मान भूमिपुत्रांचा”
या उपक्रमांतर्गत सन्मान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास माजी मंत्री तथा आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या शुभहस्ते सन्मान होणार असून, प्रमुख उपस्थितीमध्ये
मनमथआप्पा किडे, उषाताई संभाजी पाटील तळेगावकर, रामचंद्र भाऊ तिरुके, धर्मपाल देवशेट्टे, सुनीताताई संभाजी कोसंबे, प्राध्यापक माधव वाघमारे, राहुल बालाजी झोले, शिवकांता गंगाधर ताकबिडे यांचा समावेश आहे.
तसेच या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष नरसिंग सोनटक्के, उपाध्यक्ष ज्ञानोबा जाधव, उपाध्यक्ष संजय येरनाळे, कोषाध्यक्ष देवराव सोनटक्के, सचिव शिवशांभ सोनटक्के तसेच सर्व सदस्य श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठान व समस्त विराळ ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी गावातील तसेच परिसरातील सर्व नागरिक, भाविक भक्त आणि सन्मानार्थी यांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










