तकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका!अनलॉग पनीरवर बंदी;55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्सनाही झटका

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात धडाकेबाज कारवाई करत आहेत.तुकाराम मुंढेंनी आणखी एक मोठा दणका दिला आहे. FDA ने महाराष्ट्रात ॲनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षाची बंदी घातली आहे. आता पर्यंत 55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट करण्यात आले असून अनेकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

अनलॉग पनीरवर बंदी

FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांन मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात ॲनालॉग पनीर म्हणजे नॉन डेरी पनीर विकल जात होतं. ते वनस्पती किंवा पामतेलचा वापर करुन तयार करण्यात आलं असतं. पण पनीर समजून ते नागरिकांना खायला दिलं जाऊ शकतं. पनीर की अनलॉग पनीर हे सर्वसामान्य नागरीक बऱ्याचदा ओळखू शकत नाहीत. तसेच ते आरोग्यासाठी घातक आहे.त्याचा विपरीत परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो.त्यामुळे अनलॉग पनीरवर बंदी घालण्यात आली असल्याचं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात 30 जुलै रोजी अधिसूचना काढून उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, विक्रीवर आणि वितरणावर बंदी घातली आहे.

दंडात्मक कारवाई होणार

पुढे बोलताना मुंढे यांनी सांगितले की, “आम्ही 308 ठिकाणांवरून पनीरचे नमुने घेतले होते, त्यातील 35 टक्के नमुने घातक होते. आता आगामी काळात विशेष मोहिम राबवणार आहोत, जिथे गोदामं आहेत तिथे तपासणी होणार आहे. आता आगामी काळा आस्थापनांनी दुधाच्याच पनीरचा वापर करावा, कुणी बनावट पनीर विकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करणार आहोत.”

55 कोटींचा 28 लाख किलो साठा जप्त

एवढंच नाही तर अन्न पदार्थांसंदर्भात 25 मे ते 31 जुलै पर्यंत मोठी कारवाई करण्यात आली. 3 हजार 136 आस्थापनांची तपासणी करण्यात आली, तसेच 774 आस्थापन्ना नोटीसा पाठवण्यात आली आहे. तसेच 165 आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले. या कारवाईत 28 लाख 66 हजार 96 किलो साठा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत 55 कोटी रुपये होती. तसेच राज्यातील 890 फूड आऊट लेट्सची तपासणी करण्यात आली.तसेच 329 हॉटेलना सुधारणा नोटीस बजावल्या असून 116 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच 11 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत ही FDA नं केलेली मोठी कारवाई आहे.

हॉटेल देखील ॲनालॉग पनीर वापरू शकणार नाहीत

पनीर हा दुधाचा पदार्थ आहे पण ॲनालॉग पनीरमध्ये नॉन दुग्धजन्य पदार्थ आढळले आहेत, त्यामुळे त्यावर बंदीचा निर्णय घेतला आहे. अशा पनीरची छुप्या पद्धतीने विकली जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सगळे आदेश उत्पादक प्रक्रिया करणारे, वाहतुकदार , वितरक, विक्रेते यांच्यासाठी बंधनकारक असणार आहेत. आता हॉटेल देखील ॲनालॉग पनीर वापरू शकत नाही, कारण या पनीरमध्ये प्रोटीन पेक्षा वनस्पती चरबी आढळली आहे. जी शिक्षा गुटखाबंदी संदर्भात आहे, तीच शिक्षा ॲनालॉग पनीर विकणाऱ्यांना दिली जाणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत लोक कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने भव्य कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात लेखक गोरक्षनाथ पवार लिखित ‘चमकणारे दिवे (भाग २)’ या पुस्तकाचा…

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईच्या काळाचौकी येथील गणेशोत्सवाला गालबोट लागेल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात काळाचौकी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या…

    Leave a Reply

    You Missed

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ