कॉक्रोच जनता पार्टीची आगामी रणनीती ठरली असून अभिजीत दीपकेंनी आपल्या पार्टीची आगामी भूमिकेबद्दल माहिती दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत आपल्या पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सप्टेंबरपासून देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही जनसंपर्क मोहीम राबविण्याची घोषणा केली. या मोहिमेद्वारे नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रश्न थेट जाणून घेतले जाणार असून शिक्षण, बेरोजगारी, न्यायव्यवस्था, लोकशाही संस्था आणि माध्यमांची भूमिका या मुद्द्यांवर पक्ष अधिक आक्रमकपणे भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही सरकारला झुकवले….
पत्रकार परिषदेत बोलताना दिपकेनं दावा केला की, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनातून आम्ही सरकारला झुकवले. तो केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नव्हता, तर नागरिकांच्या मनातील भीती संपवण्याचा तो मोठा विजय होता. त्यामुळे प्रधानांचा राजीनामा हाच आमचा विजय आहे” आता देशातील नागरिक प्रश्न विचारण्यासाठीच नव्हे, तर गरज पडल्यास रस्त्यावर उतरतील,असा विश्वास त्याने व्यक्त केला.
तसेच “या देशात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज घेण्यासारखं आहे. या देशातील शिक्षणव्यवस्था बदलण्याची गरज असल्याचं म्हणत CJP च्या आंदोलनामुळे लोकांच्या मनातील भीती कमी झाली असल्याचं दीपकेनं म्हटलं.
CJP ची रणनीती ठरली
दरम्यान CJP ची रणनीती ठरली असून आगामी काळात देशभरात सीजेपी देशभरात मोहीम राबवणार आहे.’क्या बोलती पब्लिक’ नावाने CJP कॅम्पेन राबवणार असल्याची घोषणा अभिजीत दीपकेनं केली आहे. ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेअंतर्गत पक्षाचे कार्यकर्ते देशभर दौरा करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. “आज अनेक राजकीय पक्ष लोकांपासून दूर गेले आहेत. देशातील ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील आहे, मात्र त्यांच्या शिक्षण, रोजगार आणि भविष्याबद्दल कोणीही गंभीरपणे बोलत नाही. सरकारचे लक्ष केवळ हिंदू-मुस्लिम राजकारणावर आहे,” अशी टीका दिपके यांनी केली.
CJP सुरु करणार आहे ही मोहिम
दिपकेनं न्यायव्यवस्था, माध्यमे आणि लोकशाही संस्थांवरही प्रश्न उपस्थित करत सामान्य नागरिकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. सरकारला जबाबदार धरण्यासाठी स्वतंत्र माध्यमे आणि मजबूत संस्था आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी पक्षाचे नेते सौरव दासने कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘क्या बोलती पब्लिक’ या नावाने मोहीम सुरु करण्यात येत असल्याची घोषणा केली. विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षाशी जोडावे, असे आवाहन त्यांनी केले. सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेद्वारे देशभरातील नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यावर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘क्या बोलती पब्लिक’
कॉक्रोच जनता पार्टीची विचारधारा संविधानावर आधारित असल्याचे सांगताना दिपके म्हणाले की, पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भारताच्या संकल्पनेवर विश्वास ठेवतो. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय हीच पक्षाची मूलभूत तत्त्वे असतील,असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच दिपकेने न्यायव्यवस्था,माध्यमे आणि लोकशाही संस्थांवरही प्रश्न उपस्थित करत सामान्य नागरिकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. सरकारला जबाबदार धरण्यासाठी स्वतंत्र माध्यमे आणि मजबूत संस्था आवश्यक असल्याचं त्याने सांगितलं.
मोहीमेद्वारे विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षाशी जोडावं
दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीसोबत ‘क्या बोलती पब्लिक’ या मोहीमेद्वारे विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षाशी जोडावे, असं आवाहन त्यांनी केलंय. सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेद्वारे देशभरातील नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यावर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचेही CJP ने स्पष्ट केले.








