अभिजीत दीपकेची मोठी घोषणा! देशभरात राबवणार ‘ही’ रणनीती; CJP मुळे सरकारचं टेन्शन वाढलं

कॉक्रोच जनता पार्टीची आगामी रणनीती ठरली असून अभिजीत दीपकेंनी आपल्या पार्टीची आगामी भूमिकेबद्दल माहिती दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत आपल्या पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सप्टेंबरपासून देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही जनसंपर्क मोहीम राबविण्याची घोषणा केली. या मोहिमेद्वारे नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रश्न थेट जाणून घेतले जाणार असून शिक्षण, बेरोजगारी, न्यायव्यवस्था, लोकशाही संस्था आणि माध्यमांची भूमिका या मुद्द्यांवर पक्ष अधिक आक्रमकपणे भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही सरकारला झुकवले….

पत्रकार परिषदेत बोलताना दिपकेनं दावा केला की, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनातून आम्ही सरकारला झुकवले. तो केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नव्हता, तर नागरिकांच्या मनातील भीती संपवण्याचा तो मोठा विजय होता. त्यामुळे प्रधानांचा राजीनामा हाच आमचा विजय आहे” आता देशातील नागरिक प्रश्न विचारण्यासाठीच नव्हे, तर गरज पडल्यास रस्त्यावर उतरतील,असा विश्वास त्याने व्यक्त केला.

तसेच “या देशात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज घेण्यासारखं आहे. या देशातील शिक्षणव्यवस्था बदलण्याची गरज असल्याचं म्हणत CJP च्या आंदोलनामुळे लोकांच्या मनातील भीती कमी झाली असल्याचं दीपकेनं म्हटलं.

CJP ची रणनीती ठरली

दरम्यान CJP ची रणनीती ठरली असून आगामी काळात देशभरात सीजेपी देशभरात मोहीम राबवणार आहे.’क्या बोलती पब्लिक’ नावाने CJP कॅम्पेन राबवणार असल्याची घोषणा अभिजीत दीपकेनं केली आहे. ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेअंतर्गत पक्षाचे कार्यकर्ते देशभर दौरा करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. “आज अनेक राजकीय पक्ष लोकांपासून दूर गेले आहेत. देशातील ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील आहे, मात्र त्यांच्या शिक्षण, रोजगार आणि भविष्याबद्दल कोणीही गंभीरपणे बोलत नाही. सरकारचे लक्ष केवळ हिंदू-मुस्लिम राजकारणावर आहे,” अशी टीका दिपके यांनी केली.

CJP सुरु करणार आहे ही मोहिम 

दिपकेनं न्यायव्यवस्था, माध्यमे आणि लोकशाही संस्थांवरही प्रश्न उपस्थित करत सामान्य नागरिकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. सरकारला जबाबदार धरण्यासाठी स्वतंत्र माध्यमे आणि मजबूत संस्था आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी पक्षाचे नेते सौरव दासने कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘क्या बोलती पब्लिक’ या नावाने मोहीम सुरु करण्यात येत असल्याची घोषणा केली. विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षाशी जोडावे, असे आवाहन त्यांनी केले. सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेद्वारे देशभरातील नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यावर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘क्या बोलती पब्लिक’

कॉक्रोच जनता पार्टीची विचारधारा संविधानावर आधारित असल्याचे सांगताना दिपके म्हणाले की, पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भारताच्या संकल्पनेवर विश्वास ठेवतो. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय हीच पक्षाची मूलभूत तत्त्वे असतील,असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच दिपकेने न्यायव्यवस्था,माध्यमे आणि लोकशाही संस्थांवरही प्रश्न उपस्थित करत सामान्य नागरिकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. सरकारला जबाबदार धरण्यासाठी स्वतंत्र माध्यमे आणि मजबूत संस्था आवश्यक असल्याचं त्याने सांगितलं.

मोहीमेद्वारे विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षाशी जोडावं

दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीसोबत ‘क्या बोलती पब्लिक’ या मोहीमेद्वारे विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षाशी जोडावे, असं आवाहन त्यांनी केलंय. सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेद्वारे देशभरातील नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यावर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचेही CJP ने स्पष्ट केले.

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

    बुधवारी ५ ऑगस्ट २०२६ शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. दरम्यान…

    शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

    अकोल्यातील शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तब्बल 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून 65 शिक्षकांची वेतनवाढ थांबवण्यात आली.अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गाजलेल्या बहुचर्चित…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

    शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

    अभिजीत दीपकेची मोठी घोषणा! देशभरात राबवणार ‘ही’ रणनीती; CJP मुळे सरकारचं टेन्शन वाढलं

    अभिजीत दीपकेची मोठी घोषणा! देशभरात राबवणार ‘ही’ रणनीती; CJP मुळे सरकारचं टेन्शन वाढलं

    अभिनेता राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा लिलाव; डोक्यावर 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

    अभिनेता राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा लिलाव; डोक्यावर 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

    शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

    शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

    तकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका!अनलॉग पनीरवर बंदी;55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्सनाही झटका

    तकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका!अनलॉग पनीरवर बंदी;55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्सनाही झटका

    साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न; महाराष्ट्राभरातून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद

    साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न; महाराष्ट्राभरातून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे गेलं? एका मुद्द्यामुळे शिंदे गट अडचणीत, सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद; कोर्टात काय घडलं?

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे गेलं? एका मुद्द्यामुळे शिंदे गट अडचणीत, सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद; कोर्टात काय घडलं?

    राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का! अंतर्गत वाद चव्हाट्यावर,पदाधिकारी का देत आहेत राजीनामे?

    राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का! अंतर्गत वाद चव्हाट्यावर,पदाधिकारी का देत आहेत राजीनामे?

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!