प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

भारताच्या डीप-टेक क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या एका मोठ्या निधीवाटपावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. पहिल्या टप्प्यात २२ खाजगी कंपन्यांना २,१९२ कोटी रुपयांची सवलतीचे कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. मात्र,’द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या अहवालानुसार एका तपासणीतून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

१२४ अर्जदारांमधून २२ कंपन्यांची निवड अन् २,१९२ कोटी रुपयांची सवलतीचे कर्ज

मंजूर करण्यात आलेल्या २,१९२ कोटी रुपयांपैकी तब्बल ६२ टक्के रक्कम म्हणजेच १,३७७ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी अशा कंपन्यांना मिळाला आहे, ज्यांचा थेट संबंध निवड समितीच्या सदस्यांशी असल्याचं म्हटलं जातं. एकूण १२४ अर्जदारांमधून २२ कंपन्यांची निवड करण्यात आली. यासाठी १२ सदस्यांचे पॅनेल तयार करण्यात आले होते, ज्यामध्ये खाजगी क्षेत्रातील ११ तज्ज्ञ आणि १ सरकारी प्रतिनिधी होता. तपासणीनुसार, निवड झालेल्या २२ पैकी १५ कंपन्यांचे थेट संबंध या निवड समितीतील ७ सदस्यांशी आहेत.

या कंपन्यांना एकूण १,३७७ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी

म्हणजे या कंपन्यांना एकूण १,३७७ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. यापैकी नऊ कंपन्या निवड समितीच्या अध्यक्षांशी संबंधित आहेत, जे एका एंजल इन्व्हेस्टिंग नेटवर्कचे संस्थापक आहेत आणि निवडलेल्या कंपन्यांपैकी किमान एका कंपनीत त्यांची हिस्सेदारी देखील आहे.हे सदस्य तंत्रज्ञान विकास मंडळाच्या गुंतवणूक समितीचे भाग आहेत, जे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या दोन संस्थांपैकी एक आहे, ज्यांच्यावर नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ₹१ लाख कोटींच्या संशोधन, विकासासाठी निधी देण्यासाठी कंपन्यांची निवड करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या कंपन्यांशी संपर्क साधला असता, पॅनेलच्या सर्व सात सदस्यांनी कोणताही गैरप्रकार केल्याचे आरोप फेटाळले आहेत.

संसदेतही उचलला गेला मुद्दा

दरम्यान हा मुद्दा नुकताच संसदेतही उचलला गेला. काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रवीण चक्रवर्ती यांनी यावर प्रश्न उपस्थित केले. यावर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत उत्तर देताना, निधीसाठी निवडलेल्या कंपन्यांमध्ये आर्थिक हितसंबंध जाहीर केलेल्या सात सदस्यांची नावे मान्य केली.

खासदार प्रवीण चक्रवर्ती यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना म्हटलं की, “डीप-टेक मधील संशोधन आणि विकासासाठी निधी देणाऱ्या समितीत प्रामुख्याने शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि नफा न कमावणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असावा. व्यावसायिक मूल्यांकन बाहेरूनही करून घेता आले असते.”

आरोपांवर सरकारचे स्पष्टीकरण

तर दुसरीकडे या आरोपांवर समितीचे सदस्य आणि सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. निवड समितीच्या सर्व सात सदस्यांनी कसलाही गैरप्रकार झाल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. त्यांच्या मते त्यांनी आपल्या गुंतवणुकीची माहिती सरकारला आधीच दिली होती.तसेच नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या कंपन्यांशी त्यांचा संबंध होता, त्या कंपन्यांच्या मूल्यांकन प्रक्रियेतून ते स्वतः दूर राहिले होते.एवढंच नाही तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानेही स्पष्ट केले आहे की, ही सर्व निवड केवळ “गुणवत्तेच्या आधारावर” झाली आहे आणि हितसंबंध असलेल्या कोणत्याही सदस्याचा संबंधित प्रस्तावांच्या मंजुरी प्रक्रियेशी कोणताही संबंध नाही.

निवड समितीच्या सर्व सात सदस्यांनी कसलाही गैरप्रकार झाल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असले आणि नियमांचे पालन केल्याचे सरकार सांगत असले, तरी १ लाख कोटी रुपयांच्या या निधीच्या पारदर्शकतेवर आणि नैतिकतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी…

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबईत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. तसेच अमित शहा हे मुंबई विभागीय भाजप आणि प्रदेश भाजपच्या…

    Leave a Reply

    You Missed

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

    रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल