राज्यात सध्या ऊन-पावसाचा लपंडाव सुरू असून काही भागात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. मात्र, याच दरम्यान हवामान विभागाने एक महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. आज, सोमवार १७ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान खात्याने सतर्कतेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईसह इतर जिह्यात कसं राहणार आहे पावसाची परिस्थिती जाणून घेऊयात.
मुंबई आणि नाशिकमधील हवामानाची स्थिती
मुंबईमध्ये सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६ रोजी मुंबईत अंशतः ढगाळ हवामान असून, दिवसा तापमान २६°C च्या आसपास राहील, मात्र जाणवणारे तापमान ३०°C पर्यंत पोहोचू शकते. दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता असून, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग वाढून पावसाची शक्यता आहे.
तर नाशिकमध्येही मुसळधार पाऊस असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६ रोजी नाशिकमध्ये दिवसभर हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या दिवशी कमाल तापमान २६°C पर्यंत पोहोचेल, तर किमान तापमान २२°C राहण्याची अपेक्षा आहे. दुपारच्या सुमारास, विशेषतः १२ वाजता ते ३ वाजेपर्यंत, पावसाची शक्यता सर्वाधिक म्हणजे ९०% ते ८५% पर्यंत राहील.
‘या’ ५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या ५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः या जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
जळगाव, धुळे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालन, धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात श्रावणसरी कोसळतील.विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
जळगाव, धुळे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालन, धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात श्रावणसरी कोसळतील.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत हे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यालाच लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किमीमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. अशामध्ये हे क्षेत्र आज अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पावसावर होताना पाहायला मिळत आहे.








