नेपाळमध्ये हाय अलर्ट जारी! हवामानही स्वच्छ असतानाही नेपाळमध्ये भीषण पूर, ७ जणांचा मृत्यू, ४१ हून अधिक बेपत्ता

उत्तरी नेपाळमध्ये बुधवारी सकाळी अचानक महापूर आल्याने सीमावर्ती भागातील वस्त्यांमध्ये प्रचंड हाहाकार माजला आहे. या आपत्तीमुळे सखल भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ‘भोटे कोशी’ नदीला अचानक भीषण पूर आला. हा पुराचा पाण्याचा लोट तिबेटच्या बाजूने आल्याचे सांगण्यात येत आहे.

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात अचानक भीषण पूर

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. या पुरात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 41 हून अधिक जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. तिबेटमधून नेपाळमध्ये येणाऱ्या भोटेकोशी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने नदीकाठच्या परिसरात हाहाकार उडाला. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि लगतच्या स्याफ्रुबेसी परिसरात प्रचंड नुकसान झालं आहे. या प्रवाहात अनेक वाहने, सामान व मालमत्ता वाहून गेली आहे.

 

या अचानक आलेल्या पुरात अनेक बाजारपेठा पाण्याखाली गेल्या असून काही जलविद्युत प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले आहे. परिस्थिती गंभीर असल्याने प्रशासनाने त्रिशूली नदीच्या खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केलं आहे.

पोलीस अन् जवानांना तैनात करण्यात आलं आहे

नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, भीषण पुराची परिस्थिती पाहता बचाव आणि मदत कार्य तीव्र करण्यासाठी रसुवा व आसपासच्या भागात नेपाळ सेना, सशस्त्र पोलीस बळ आणि नेपाळ जवानांना तैनात करण्यात आले आहे. पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना आखण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.

 

हवामानही स्वच्छ असतानाही, पुरामागचं नेमके कारण काय?

या पुरामागचं नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रसुवा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा अधिकारी नरेंद्र परियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालय आणि आसपासच्या भागात पाऊसच झाला नव्हता. हवामानही स्वच्छ होते. त्यामुळे कोणताही मोठा पाऊस न पडता नदीला अचानक एवढा प्रचंड पूर कसा आला, याबद्दल तपास सुरु आहे. प्रशासनाने वरच्या हिमालयीन भागात एखादे हिमनदी तलाव फुटले असावे किंवा पाण्याचा तात्पुरता अडथळा तुटला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे स्पष्ट कारण समोर आलेले नाही. नदीतील पाण्याचा जोर कायम असल्याने नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांतील काही भागांवरही पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या भागातील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    इस्रोचा मोठा निर्णय! इस्रो रॉकेट बनवणे थांबवणार; आता रॉकेट आणि उपग्रह निर्मिती खाजगी कंपन्यांकडे

    भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने आपल्या धोरणात महत्त्वाचे बदल केले आहेत. या अंतर्गत, इस्त्रो संशोधन, विकास आणि मोठ्या अंतराळ मोहिमांवर लक्ष केंद्रित करणार आहे. यासोबतच प्रक्षेपण याने आणि नियमित उपग्रहांच्या निर्मितीची…

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या खर्चांवरून विरोधकांनी अनेकदा सरकारवर जोरदार टीकाही केल्याचं पाहायला मिळालं आहे. कारण सध्या चर्चा होतेय…

    Leave a Reply

    You Missed

    लाडकी बहिणांची चिंता वाढणार! ‘लाडकी बहीण योजने’बाबत सरकारचा मोठा निर्णय

    लाडकी बहिणांची चिंता वाढणार! ‘लाडकी बहीण योजने’बाबत सरकारचा मोठा निर्णय

    नेपाळमध्ये हाय अलर्ट जारी! हवामानही स्वच्छ असतानाही नेपाळमध्ये भीषण पूर, ७ जणांचा मृत्यू, ४१ हून अधिक बेपत्ता

    नेपाळमध्ये हाय अलर्ट जारी! हवामानही स्वच्छ असतानाही नेपाळमध्ये भीषण पूर, ७ जणांचा मृत्यू, ४१ हून अधिक बेपत्ता

    गणेशोत्सवासाठी नवे नियम! भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू

    गणेशोत्सवासाठी नवे नियम! भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू

    इस्रोचा मोठा निर्णय! इस्रो रॉकेट बनवणे थांबवणार; आता रॉकेट आणि उपग्रह निर्मिती खाजगी कंपन्यांकडे

    इस्रोचा मोठा निर्णय! इस्रो रॉकेट बनवणे थांबवणार; आता रॉकेट आणि उपग्रह निर्मिती खाजगी कंपन्यांकडे

    धोतऱ्याचे फळ अन् बिया विकणे महागात! Amazon, Swiggy Instamart आणि BigBasket चे अन्न परवाने थेट निलंबित

    धोतऱ्याचे फळ अन् बिया विकणे महागात! Amazon, Swiggy Instamart आणि BigBasket चे अन्न परवाने थेट निलंबित

    आदगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा! पोलीस दलात भरती झालेल्या मानसीसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव

    आदगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा! पोलीस दलात भरती झालेल्या मानसीसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव

    तुकाराम मुंडेंची धडक कारवाई! खराब भांडी, अस्वच्छता अन् शिळे अन्न; मुंबई क्रिकेट असोसिएशनवर FDAचा मोठा दणका

    तुकाराम मुंडेंची धडक कारवाई! खराब भांडी, अस्वच्छता अन् शिळे अन्न; मुंबई क्रिकेट असोसिएशनवर FDAचा मोठा दणका

    तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंलुंड आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

    तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंलुंड आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

    मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम

    मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम