मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

राज्यात विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आढावा घेत असून संपूर्ण प्रशासनाला ‘अलर्ट मोड’वर राहण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांमध्ये तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये 117 मिमी, बारामतीत 104.75 मिमी, तर इंदापूरात 63.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बारामतीमध्ये 25 घरांचे अंशतः नुकसान झाले असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

इंदापूरमध्ये 2 जणांना पूरस्थितीतून वाचविण्यात आले असून, फलटणमध्ये तब्बल 163.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तेथे एनडीआरएफची एक टीम तैनात असून, दुधेबावी गावाजवळ अडकलेल्या 30 नागरिकांना निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात 6 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले असून, त्यांचे बचावकार्य सुरू आहे. रायगड जिल्ह्यात वीज पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.

मुंबईत 24 तासांत 135.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या, 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या आणि 5 ठिकाणी इमारतींच्या भिंती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, कोणतीही प्राणहानी झालेली नाही. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, पोलीस व एनडीआरएफच्या 5 टीम्स पूर्ण सज्ज आहेत.

हवामान खात्याने मुंबईसह कोकण विभागात पुढील 24 तास वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य सचिवांसह सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, महसूल व गृह विभाग यांना तातडीच्या उपाययोजनांसाठी नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून कार्यरत राहण्यास सांगितले आहे.

तसंच जलसंपदा विभागाशी सतत समन्वय राखण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्य सरकार पावसामुळे निर्माण झालेल्या प्रत्येक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे स्पष्ट संकेत यामधून मिळत आहेत.

  • Related Posts

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्या वाहनाला लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड उड्डाणपूलावर आज भीषण अपघात झाला. वाहन स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडत चार वेळा पलटी घेतल्याने हा अपघात…

    मॉन्सूनने अंदमानात दिली हजेरी, महाराष्ट्रात 6 जूनला आगमनाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज

    आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने अंदमानात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशभरात मान्सूनचे आगमन वेगाने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…

    Leave a Reply

    You Missed

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही