मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

राज्यात विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आढावा घेत असून संपूर्ण प्रशासनाला ‘अलर्ट मोड’वर राहण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांमध्ये तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये 117 मिमी, बारामतीत 104.75 मिमी, तर इंदापूरात 63.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बारामतीमध्ये 25 घरांचे अंशतः नुकसान झाले असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

इंदापूरमध्ये 2 जणांना पूरस्थितीतून वाचविण्यात आले असून, फलटणमध्ये तब्बल 163.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तेथे एनडीआरएफची एक टीम तैनात असून, दुधेबावी गावाजवळ अडकलेल्या 30 नागरिकांना निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात 6 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले असून, त्यांचे बचावकार्य सुरू आहे. रायगड जिल्ह्यात वीज पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.

मुंबईत 24 तासांत 135.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या, 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या आणि 5 ठिकाणी इमारतींच्या भिंती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, कोणतीही प्राणहानी झालेली नाही. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, पोलीस व एनडीआरएफच्या 5 टीम्स पूर्ण सज्ज आहेत.

हवामान खात्याने मुंबईसह कोकण विभागात पुढील 24 तास वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य सचिवांसह सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, महसूल व गृह विभाग यांना तातडीच्या उपाययोजनांसाठी नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून कार्यरत राहण्यास सांगितले आहे.

तसंच जलसंपदा विभागाशी सतत समन्वय राखण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्य सरकार पावसामुळे निर्माण झालेल्या प्रत्येक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे स्पष्ट संकेत यामधून मिळत आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी

    राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी आली आहे. ईतकेच नव्हे तर मानसिक आणि आर्थिक दडपणाचे ओझे घेऊन जनतेला दर्जेदार…

    मंत्रालयात डी.जी. प्रवेश – सन्मान की त्रासदायक प्रतीक्षा?

    जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या “मंत्रालय” या प्रशासकीय मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी काही वेगवेगळ्या श्रेणीचे पास आणि परवानग्या दिल्या जातात. त्यामध्ये “डी.जी. प्रवेश” म्हणजेच D.G. Entry हा एक विशेष आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय! — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना

    असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय!  — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना