मढ:जरीमरी माता मंदिरातून दोन सोन्याचे मंगळसूत्र चोरी; परिसरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्येही वाढ

मुंबई : मढ परिसरातील जरिमरी माता मंदिरातून दोन सोन्याचे मंगळसूत्र चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती भाजप कार्यकर्ते प्रमोद यादव यांनी जागृत महाराष्ट्र न्यूजला दिली.

प्रमोद यादव यांनी सांगितले की, जरिमरी माता मंदिरातील दोन सोन्याच्या मंगळसूत्रांची चोरी झाली असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

तसेच मढ येथील शिवाजी नगर गेट क्रमांक २ परिसरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोपही त्यांनी केला. नागरिकांच्या मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी समोर येत असून यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिस प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणांची तपासणी करावी आणि चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

मढ परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिस प्रशासन यावर कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे…

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजू नका; आधी त्यांच्या न्यायासाठी उभे राहा!

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाने गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक राजकीय पक्ष किती गंभीर आहे, हे देशातील विद्यार्थी आणि मतदारांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा…

चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळासाहेब महादेव कोठुळे यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. दिनांक २० जून २०२६ रोजी दिल्ली येथे आयोजित भव्य कार्यक्रमात अचिव्हर अवॉर्ड…

Leave a Reply

You Missed

नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

धर्मेंद्र प्रधाननंतर नितीन गडकरी रडारवर का आहेत? राजीनाम्याची का होतेय मागणी?

धर्मेंद्र प्रधाननंतर नितीन गडकरी रडारवर का आहेत? राजीनाम्याची का होतेय मागणी?

आषाढी एकादशी निमित्त छावा संघटनेनं राबवलेला सेवा उपक्रम चर्चेत; सर्वच स्तरातून कौतुक

आषाढी एकादशी निमित्त छावा संघटनेनं राबवलेला सेवा उपक्रम चर्चेत; सर्वच स्तरातून कौतुक

ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; हातात तिरंगा अन् पोस्टर घेऊन सभा स्थळी हजारो Gen-Z ची गर्दी

ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; हातात तिरंगा अन् पोस्टर घेऊन सभा स्थळी हजारो Gen-Z ची गर्दी

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी कोण माहितीयेत?

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी कोण माहितीयेत?

CJP च्या आंदोलनाला यश! अखेर धर्मेंद्र प्रधानांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा, जंतर मंतरवर मोठा जल्लोष

CJP च्या आंदोलनाला यश! अखेर धर्मेंद्र प्रधानांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा, जंतर मंतरवर मोठा जल्लोष

अभिजीत दीपके तापाने फणफणले, टायफॉइडची लागण;जंतर-मंतर सोडलं, आंदोलनाची पुढची दिशा काय असणार?

अभिजीत दीपके तापाने फणफणले, टायफॉइडची लागण;जंतर-मंतर सोडलं, आंदोलनाची पुढची दिशा काय असणार?

धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर, CJP चा पुढचा प्लान हा असणार; आशुतोष रांकाने स्पष्टच सांगितलं

धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर, CJP चा पुढचा प्लान हा असणार; आशुतोष रांकाने स्पष्टच सांगितलं

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजू नका; आधी त्यांच्या न्यायासाठी उभे राहा!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजू नका; आधी त्यांच्या न्यायासाठी उभे राहा!