विकासकामांचा ध्यास, प्रशासकीय शिस्त आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायतीने इतिहास घडवला आहे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ रानवलीने संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे लोकनेते तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते रानवली ग्रामपंचायतीचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.
खासदार तटकरे यांच्या हस्ते रानवली ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार
विकासकामांचा ध्यास, प्रशासकीय शिस्त आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायतीने इतिहास घडवला आहे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ रानवली ग्रामपंचायतीने संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून आपल्या यशाची मोहर उमटवली आहे. या देैदीप्यमान कामगिरीबद्दल ग्रामपंचायतीला तब्बल ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले असून, महाराष्ट्राचे लोकनेते तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा विशेष गौरव करण्यात आला. आयोजित विशेष सोहळ्यात खासदार तटकरे यांच्या हस्ते रानवली ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
‘एकजुटीतून साकारले यशाचे मॉडेल!’ खा. सुनील तटकरे
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना खासदार तटकरे यांनी रानवलीच्या संपूर्ण विकासप्रवासाचे भरभरून कौतुक केले. तेव्हा ते म्हणाले, की, “हा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमान केवळ एका व्यक्तीचा किंवा पदाचा नसून, रानवलीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक ग्रामस्थांचा, सर्व लोकप्रतिनिधींचा आणि रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा आहे. सर्वांच्या एकजुटीतूनच हे देदीप्यमान यश शक्य झाले असून हे यश संपूर्ण रानवली परिवाराचे आहे.”
रानवलीच्या यशाची प्रमुख ४ सूत्रे
रानवली ग्रामपंचायतीने केवळ कागदावर योजना न ठेवता प्रत्यक्षात जमिनीवर उतरवून दाखवलेल्या कामांमुळे हा बहुमान मिळवला आहे:
पारदर्शक व डिजिटल प्रशासन: ग्रामस्थांना सर्व आवश्यक दाखले आणि दाखले-सेवा त्वरित व ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणे.
उत्कृष्ट जलव्यवस्थापन व स्वच्छता: पाणीटंचाईवर यशस्वी मात करत सुंदर, स्वच्छ व हरित गावाचा वस्तुपाठ तयार करणे.ue
शासकीय योजनांची १००% अंमलबजावणी: केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे.
सक्रिय लोकसहभाग: गावातील प्रत्येक निर्णय, उपक्रम आणि विकासकामात ग्रामस्थांचा थेट व सक्रिय सहभाग.
श्रीवर्धन तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
लोकप्रतिनिधींचा दूरदृष्टीकोन, कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि ग्रामस्थांची खंबीर साथ या ‘त्रिवेणी संगमातून’ रानवलीने रायगड जिल्ह्यासमोर विकासाचा एक आदर्श मॉडेल ठेवला आहे. या ऐतिहासिक यशामुळे श्रीवर्धन तालुक्याची मान अभिमानाने उंचावली असून, संपूर्ण जिल्ह्यातून रानवली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








