ठाकरे बंधू एकत्र येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा समिकरणाचा सूर, फडणवीस-लोढांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी चर्चा रंगू लागली आहे – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू पुन्हा एकत्र येणार का? या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे, कारण खुद्द उद्धव ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी युतीसंदर्भात सकारात्मक संकेत दिले आहेत.

मुंबई आणि कोल्हापूरसह राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये या चर्चेमुळे प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येणं ही काळाची गरज आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार एकत्र आले, तर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो.”

या पार्श्वभूमीवर माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता, त्यांनी थेट उत्तर देणं टाळत, “त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया राज ठाकरे देतील, मी कशी देणार? माझा काय संबंध? तुम्हीच जास्त तारे तोडत आहात. सध्या त्यावर काही बोलण्यासारखं नाही,” असे म्हणत विषयावरून हात झटकले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर “आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवू आणि जिंकू,” असा विश्वास व्यक्त केला.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मात्र या संभाव्य युतीवर टीका करत “सब कुछ लुटा कर मिला तो क्या हुआ” असा सिने डायलॉग टाकत टोला लगावला. ते म्हणाले, “शिवसेना आणि मनसे एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. जनता विकास बघते. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास होतोय. त्यामुळे लोक आमच्यासोबत आहेत.

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    माहिमच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्यविभाग आयोजित ‘नाट्यांश’ हा एकाकिकांचा महोत्सव माटुंगाच्या यशवंत नाट्यमंदिर नाट्यगृहात येत्या सोमवारी २७ तारखेला रंगणार आहे. या महोत्सवात रुपारेल नाट्यविभागाच्या एकूण तीन एकांकिका सादर केल्या जाणार…

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    मुंबई, दि. २० : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातील कामकाज आता नागरिकांसाठी थेट (लाईव्ह) प्रसारित करण्यास सुरुवात करण्यात आली असून, ही पारदर्शकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जात आहे. नगरसेवक हैदर अली…

    Leave a Reply

    You Missed

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    • By Admin
    • April 22, 2026
    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड