जालना जिल्ह्यात हृदयद्रावक घटना : शेतीकाम करताना वडील आणि दोन चिमुकल्यांचा विद्युत धक्क्याने मृत्यू

जालना जिल्ह्यातील वरुड गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पावसाने सध्या दडी मारल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. या तयारीसाठी शेतात गेलेल्या एका शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेतकाम करत असताना विद्युत तारेचा शॉक लागून वडिलांसह दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

ही घटना जालना तालुक्यातील वरुड गावात घडली. विनोद मस्के असे मृत पित्याचे नाव असून, त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा समर्थ मस्के आणि मुलगी श्रद्धा मस्के या दोघांचाही मृत्यू झाला आहे. हे तिघेही पेरणीपूर्व कामांसाठी शेतात गेले असताना अचानक विद्युत तारेचा संपर्क आल्याने हा अपघात घडला.

घटनेनंतर तिघांनाही तत्काळ उपचारासाठी जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. सध्या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.

या अपघातामुळे मस्के कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण वरुड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ मदतीची कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    माहिमच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्यविभाग आयोजित ‘नाट्यांश’ हा एकाकिकांचा महोत्सव माटुंगाच्या यशवंत नाट्यमंदिर नाट्यगृहात येत्या सोमवारी २७ तारखेला रंगणार आहे. या महोत्सवात रुपारेल नाट्यविभागाच्या एकूण तीन एकांकिका सादर केल्या जाणार…

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    मुंबई, दि. २० : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातील कामकाज आता नागरिकांसाठी थेट (लाईव्ह) प्रसारित करण्यास सुरुवात करण्यात आली असून, ही पारदर्शकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जात आहे. नगरसेवक हैदर अली…

    Leave a Reply

    You Missed

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    • By Admin
    • April 22, 2026
    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड