प्रतिनिधी रामदास चव्हाण
सुरुवातीला दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिका कुठेही नव्हती श्रीवर्धन, म्हसळा,माणगाव, बाणकोट, मंडणगड,पोलादपूर, महाड एवढा मोठा कव्हरेज त्यावेळेस होता, कधी कुणाला नाही या शब्द त्याच्या तोंडातून आला नाही. दोन दोन तीन तीन फेऱ्या पनवेल आणि मुंबई असा मोठा प्रवास त्यांनी रुग्णांना घेऊन केला आहे. काही पेशंटला जीवनदान देण्याचे काम सार्थपणे त्यानीं केले,मुंबई गोवा हायवे असेल, आंबेनळी दुर्घटना असो सावित्री पुल दुर्घटना असो तारीख गार्डन दुर्घटना असो किंव्हा करोना काळ असो त्यावेळेस पहिला रुग्णविका असेल ती महाडकारांचीच रुग्णविका ॲम्बुलन्स वाल्यांच्या सिंहाचा वाटा असतो, मुंबई गोवा हायवे वर अपघात झाला तर, महाड शहर पोलीस स्टेशन, महाड तालुका पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस स्टेशन सर्व कर्मचाऱ्यांना माहिती आहे अनिल चव्हाणला फोन केला का ॲम्बुलन्स दहा मिनिटाच्या आत पोचणार एवढा आत्मविश्वास हा पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांमुळे त्याच्यात आलं, कधीही अपघातग्रस्तांच्या खिशातला एक रुपया तरी चोरीला गेला असल्यास व दागिने चोरीला गेले असल्यास अशी एकही घटना त्याच्या बद्दल घडलेली नाही एवढं स्वच्छ व प्रामाणिक काम त्यांनी केले.. अशा या महाडच्या देवदूताचा लायन्स डिस्ट्रिक गवर्नल संजीव सूर्यवंशी, व्हाईस गवर्नल प्रवीण सरनाईक, सेकंड व्हाईस गवर्नल ,विजय गनात्रा व लायन्स क्लब महाडच्या प्रेसिडेंट स्नेहल बुटाला इत्यादी मान्यवरांच्या हस्ते अनिल चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना लायन्स गौरव ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले..








