कार्यकर्ता ते उत्तर मुंबई जिल्हा महासचिवपद! अ‍ॅड. विक्रम कपूर यांचा यशस्वी राजकीय आणि सामाजिक प्रवास, कार्याचा काँग्रेसकडून सन्मान

काँग्रेसचे एक निष्ठावान,अभ्यासू आणि कार्यतत्पर कार्यकर्ते अशी ओळख असणारे अ‍ॅड. विक्रम कपूर यांची उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदी निवड करण्यात आली आहे. कोणतीही भक्कम राजकीय पार्श्वभूमी पाठीशी नसताना, केवळ स्वतःचे कष्ट, पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि तळागाळातील लोकांशी जपलेली बांधिलकी यांच्या बळावर त्यांनी हा टप्पा गाठला आहे.

माजी मंत्री तथा आमदार असलम शेख यांचे अत्यंत विश्वासू आणि खंदे सहकारी म्हणून अ‍ॅड. विक्रम कपूर ओळखले जातात.पण त्यांनी त्यांच्या कार्यातून आता एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांनी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळताना नेहमीच अभ्यासूवृत्ती दाखवली आहे.

पक्षसंघटनेसाठी ग्राउंड लेव्हलवरून योगदान

अ‍ॅड विक्रम कपूर यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात एक सामान्य काँग्रेस कार्यकर्ता म्हणून केली.पण तळागाळातील कामे,वॉर्ड स्तरावर अध्यक्षांपासून ते लोकप्रतिनिधींचे सहकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.

एवढंच नाही तर पक्षाचे धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खास परिश्रम घेतले. काँग्रेस पक्षाचे विचार, धोरणे आणि कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

अ‍ॅड विक्रम कपूर यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये काय आहेत?

संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा

संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा ही दोन मुख्य गुण त्यांच्या स्वभावात आहेत.अ‍ॅड. विक्रम कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि काम करण्याच्या पद्धतीमधील हे महत्त्वाचे नियम आहेत.

शांत आणि संयमी

सोबतच शांत आणि संयमी स्वभावाने ते कायम सर्वांची मने जिंकतात. कोणताही गाजावाजा किंवा स्टंटबाजी न करता शांतपणे काम करण्यावर त्यांचा विश्वास आहे.

सामाजिक बांधीलकी

वकील असल्यामुळे प्रशासकीय कामकाज, कायद्याच्या चौकटीतील प्रश्न आणि पालिकेशी संबंधित समस्या सोडवण्यात त्यांची मोठी पकड आहे.कायदेशीर आणि प्रशासकीय कौशल्य देखील त्यांच्यात आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना ती केवळ राजकीय जबाबदारी न मानता सामाजिक बांधीलकी म्हणून पार पाडतात.

नागरी प्रश्न आणि पाठपुरावा

मुंबईतील स्थानिक नागरिकांशी सातत्याने थेट संपर्क ठेवून त्यांच्या तक्रारी ऐकून घेणे, रस्त्यांचे प्रश्न, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून समस्या तडीस नेणे ही त्यांची काम करण्याची प्रमुख पद्धत आहे.

पक्षाकडून कार्याची दखल

काँग्रेस पक्षाने त्यांच्या प्रदीर्घ सेवा आणि निष्ठावंत कार्याची दखल घेत त्यांच्यावर उत्तर मुंबई जिल्हा महासचिवपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. या नवीन जबाबदारीमुळे उत्तर मुंबईत काँग्रेस पक्षाची बांधणी आणखी मजबूत होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी, वॉर्ड स्तरावरील कार्यकर्ते, समर्थक आणि उत्तर मुंबईतील स्थानिक नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार