वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च नाही तर समाजकल्याण; 60 विद्यार्थ्यांना जेवणाची ताट ,शालेय वस्तू आणि खाऊचे वाटप

आजच्या काळात वाढदिवस पाश्चात्य संस्कृतीनुसार किंवा अनावश्यक खर्चात साजरा करण्याची प्रथा असताना, ‘निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य’ यांनी मात्र पुन्हा एकदा समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. संस्थेच्या महाराष्ट्र राज्य खजिनदार अलका सुनील चोरघे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक ३० जुलै २०२६ रोजी वसई परिसरातील ६० गरजू विद्यार्थ्यांना भोजनाची ताटे, शालेय उपयोगी वस्तू आणि खाऊचे वाटप करून अत्यंत उत्साहात व भावूक वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची आणि अभ्यासाची ज्योत 

कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय आणि शैक्षणिक वातावरणात झाली. या प्रसंगी जुलै महिन्यातील थोर राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनचरित्रावर व त्यांच्या देशभक्तीवर प्रकाश टाकण्यात आला. संस्थेच्या प्रसारमाध्यम समितीच्या सदस्य कीर्ती भट्ट आणि दयानंद सावंत सर यांनी विद्यार्थ्यांना टिळकांच्या विचारांची, त्यांच्या ध्येयनिष्ठेची आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या सिंहगर्जनेची सोप्या भाषेत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची आणि अभ्यासाची ज्योत प्रज्वलित केली.

चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानावर स्पर्धा

त्यानंतर वसई तालुका सचिव सौ. रूपाली मोलावडे यांनी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला आणि सामान्य ज्ञानाला चालना देण्यासाठी एक प्रश्नोत्तरांची स्पर्धा घेतली. चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी अत्यंत अचूक उत्तरे दिली. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने विशेष बक्षीसही देण्यात आलं.

‘आदर्श विद्यार्थी’ निवड आणि प्रोत्साहन

विद्यार्थ्यांमधील गुणांना वाव देण्यासाठी दोन्ही शाळांमधून प्रत्येकी ‘आदर्श विद्यार्थी- विद्यार्थीनी’ यांची निवड करण्यात आली. निवडून आलेल्या आदर्श विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरणारे परीक्षा पॅड बक्षीस म्हणून देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळाला.

६० विद्यार्थ्यांना उपयुक्त वस्तूंचे वाटप

वाढदिवसाचे औचित्य साधून सौ. अलका चोरघे यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत ६० गरजू विद्यार्थ्यांना रोजच्या भोजनासाठी लागणारी भोजनाची ताटे, वही-पेन यांसारख्या आवश्यक शालेय वस्तू आणि पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले. हे साहित्य हाती पडताच मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान हेच सौ. अलका चोरघे यांच्या वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट ठरले, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

पर्यावरणाचा संदेश देत संस्थेच्या परंपरेनुसार शाळा परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश विद्यार्थ्यांनी या वेळी घेतला.

मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती

या संपूर्ण कार्यक्रमाला निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भक्कम साथ लाभली. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बापू परब,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय विलास वर्तक, महाराष्ट्र राज्य सचिव शुभांगी राऊत,सहसचिव विद्या सावंत,महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य भाग्यश्री परब,मनीषा गुरव, उषा सुतार, स्मिता पाटील, कल्पना चुरी, दत्तात्रय पालव, प्रतीक्षा गुरव, अंजली गावकर, मीना ठाकोर, स्मिता कांडार आणि नंदिनी हामंद. तसेच वसई तालुका सचिव रूपाली मोलावडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला.

विश्व प्रार्थनेने सांगता

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या उद्दिष्टांना अनुसरून सर्वांचे मनापासून आभार मानण्यात आले. त्यानंतर संपूर्ण जगाच्या कल्याणाची कामना करणारी ‘विश्व प्रार्थना’ एकत्र मानून कार्यक्रमाची शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात सांगता झाली. दरम्यान निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्थेने अलका चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक पुढाकार सर्वांसमोर एक आदर्श नक्कीच ठरला आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    रेस्टॉरंट्स, हॉटेलनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आपला मोर्चा आता रुग्णालयांकडे वळवला आहे. रुग्णालयातील रुग्णांना औषधांच्या नावाखाली हजारो पटीने अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार…

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असून, महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांचा अल्टीमेटम दिला आह. जरांगे पाटील यांनी…

    Leave a Reply

    You Missed

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी