परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील श्रीक्षेत्र यशवाडी येथे आज मोठी दुर्घटना घडली आहे. हनुमान मंदिराच्या बांधकामादरम्यान दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास मंदिराचा काही भाग अचानक कोसळला.
घटनेच्या वेळी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी असल्याने १० ते २० जण ढिगाऱ्याखाली दबले असावेत,अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले असून प्रशासन, आरोग्य विभाग आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात हलविण्यात येत आहे.
दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.








