लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासनाचा निर्णय; शाळा सकाळी 8 ते 12.30

लातूर : जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशानुसार, लातूर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची वेळ तात्पुरती बदलण्यात आली आहे.

नवीन आदेशानुसार, 23 जून 2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळा सकाळी 8.00 ते दुपारी 12.30 या वेळेत चालविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच सर्व खासगी व अनुदानित शैक्षणिक संस्थांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने लातूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर उष्णताजन्य आजारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी शाळांचे सकाळच्या सत्रात नियोजन करण्यात आले असून पालकांनी आणि शाळा व्यवस्थापनांनी या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कामचुकार कर्मचाऱ्यांची बत्ती गुल; प्रशासनाची अचानक धाड अन्… ऑनलाईन हजेरी लावून कर्मचारी गायब

    जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या वेळेपासून ते काम करण्यास दिरंगाई करण्यापर्यंत अनेकदा तक्रारी समोर आल्या आहेत.पण जेव्हा प्रशासनाचा दणका बसतो तेव्हा अशा कामचुकार कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. लातूर येथील जिल्हा परिषदेत कर्मचारी…

    Leave a Reply

    You Missed

    राज्यात पावसाचा जोर कायम; मुंबई, पुणे, नाशिकमधील धरणे ओव्हरफ्लो, विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

    राज्यात पावसाचा जोर कायम; मुंबई, पुणे, नाशिकमधील धरणे ओव्हरफ्लो, विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

    अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा,उद्घाटनानंतर २० दिवसांतच ८४ ठिकाणी रस्ता खचला; भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट

    अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा,उद्घाटनानंतर २० दिवसांतच ८४ ठिकाणी रस्ता खचला; भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट

    ‘माझा डेटा,माझी जबाबदारी’! अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन, डिजिटल युगात सजग राहण्याचे धडे

    ‘माझा डेटा,माझी जबाबदारी’! अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन, डिजिटल युगात सजग राहण्याचे धडे

    शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

    शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

    अभिजीत दीपकेची मोठी घोषणा! देशभरात राबवणार ‘ही’ रणनीती; CJP मुळे सरकारचं टेन्शन वाढलं

    अभिजीत दीपकेची मोठी घोषणा! देशभरात राबवणार ‘ही’ रणनीती; CJP मुळे सरकारचं टेन्शन वाढलं

    अभिनेता राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा लिलाव; डोक्यावर 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

    अभिनेता राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा लिलाव; डोक्यावर 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

    शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

    शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

    तकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका!अनलॉग पनीरवर बंदी;55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्सनाही झटका

    तकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका!अनलॉग पनीरवर बंदी;55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्सनाही झटका

    साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न; महाराष्ट्राभरातून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद

    साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न; महाराष्ट्राभरातून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद