राज्यात पावसाचा जोर कायम; मुंबई, पुणे, नाशिकमधील धरणे ओव्हरफ्लो, विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान विभागाने आजही काही जिल्ह्यांसाठी पावसाचा मोठा इशारा दिला. सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात काही मंडळांमध्ये तब्बल 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. कोकणातही जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक येथे देखील संततधार सुरूच आहे. या तिन्ही जिल्ह्यांमधील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.

मराठवाड्यासाठी दिलासादायक पाऊस

संततधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. मराठवाड्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे जायकवाडी धरणातील पाणीसाठा 95 टक्क्यांवर पोहोचला आहे.
विदर्भातही पावसाने चांगली हजेरी लावली. सर्वत्र समाधानकारक पाऊस असून पिकेही चांगली आलीत.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच चांगला पाऊस 

राज्यात गुरूवारी 65 किलोमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. आता पावसाचा जोर कमी होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. पण पाऊस अधिक कोसळत आहे. जून महिना कोरडा केला पण जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच चांगला पाऊस होतोय.

उत्तरेकडे मात्र पावसाचा हाहाकार 

गुरुवारी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकलेल्या मान्सूनमुळे मोठा पाऊस झाला. उत्तरेकडे पावसाने हाहाकार घातला. अनेक कुटुंबांवर यामुळे मोठे संकट ओढवले. या पावसामुळे मेरठ, आग्रा, अलीगड आणि प्रयागराज यांसारख्या शहरांमधील कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 6 अंश सेल्सिअसने खाली आले. मुसळधार पावसामुळे घरे कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाला.

नागपूर हवामान विभागाचा इशारा

नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात आज शुक्रवारी पावसाचा इशारा देण्यात आला. नागपूर हवामान विभागाने दिला इशारा. काही जिल्ह्यांना साधारण पावसाचा इशारा तर अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला. नागपुरात सकाळपासून पावसाचं आणि ढगाळ वातावरण, काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात. हा पाऊस शेतीसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे, विदर्भात पाऊस चांगला झाला. एल निनोचे संकट यंदाच्या मॉन्सूनवर होते. पण दमदार पाऊस राज्यभरात कोसळताना दिसला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

‘माझा डेटा,माझी जबाबदारी’! अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन, डिजिटल युगात सजग राहण्याचे धडे

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे जीवन अधिकाधिक डिजिटल होत असताना सायबर सुरक्षेचे महत्त्व देखील वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडवण्याच्या उद्देशाने क्विक हील…

शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

बुधवारी ५ ऑगस्ट २०२६ शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. दरम्यान…

Leave a Reply

You Missed

राज्यात पावसाचा जोर कायम; मुंबई, पुणे, नाशिकमधील धरणे ओव्हरफ्लो, विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात पावसाचा जोर कायम; मुंबई, पुणे, नाशिकमधील धरणे ओव्हरफ्लो, विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा,उद्घाटनानंतर २० दिवसांतच ८४ ठिकाणी रस्ता खचला; भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट

अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा,उद्घाटनानंतर २० दिवसांतच ८४ ठिकाणी रस्ता खचला; भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट

‘माझा डेटा,माझी जबाबदारी’! अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन, डिजिटल युगात सजग राहण्याचे धडे

‘माझा डेटा,माझी जबाबदारी’! अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन, डिजिटल युगात सजग राहण्याचे धडे

शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

अभिजीत दीपकेची मोठी घोषणा! देशभरात राबवणार ‘ही’ रणनीती; CJP मुळे सरकारचं टेन्शन वाढलं

अभिजीत दीपकेची मोठी घोषणा! देशभरात राबवणार ‘ही’ रणनीती; CJP मुळे सरकारचं टेन्शन वाढलं

अभिनेता राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा लिलाव; डोक्यावर 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

अभिनेता राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा लिलाव; डोक्यावर 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

तकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका!अनलॉग पनीरवर बंदी;55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्सनाही झटका

तकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका!अनलॉग पनीरवर बंदी;55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्सनाही झटका

साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न; महाराष्ट्राभरातून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद

साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न; महाराष्ट्राभरातून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद