मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

मराठवाड्यातील नागरिकांसाठी आता गुड न्यूज आहे. रेल्वे प्रवाशांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.  लवकरच मराठवाड्यात ‘वंदे भारत’ धावणार आहे.
दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी-मुदखेड या अत्यंत वर्दळीच्या दुहेरी रेल्वे मार्गाचा कायापालट होणार आहे.  भारतीय रेल्वेने या मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल 163 कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे भविष्यात या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेससारख्या अतिवेगवान गाड्या चालवणे अधिक सुलभ होणार आहे.

रेल्वे ट्रॅक किलोमीटर मार्गावरील जुनी वीज यंत्रणा पूर्णपणे बदलली जाणार

या 163 कोटी रुपयांच्या प्रकल्पाअंतर्गत 164 रेल्वे ट्रॅक किलोमीटर मार्गावरील जुनी वीज यंत्रणा पूर्णपणे बदलली जाणार आहे. सध्या या मार्गावर कार्यरत असलेली 1×25 केव्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रणाली काढून त्याऐवजी अत्याधुनिक आणि उच्च क्षमतेची 2×25 केव्ही प्रणाली बसवली जाईल.

रेल्वेगाड्यांना विनाअडथळा आणि अखंड वीजपुरवठा मिळेल

वाढीव वीजभार हाताळण्यासाठी वीज उपकेंद्रे आणि इतर पायाभूत सुविधांचेही आधुनिकीकरण केले जाणार आहे. यामुळे रेल्वेगाड्यांना विनाअडथळा आणि अखंड वीजपुरवठा मिळेल, ज्यामुळे तांत्रिक बिघाड कमी होऊन गाड्यांचा वेग वाढेल.

औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्राला मोठा फायदा

परभणी-मुदखेड हा रेल्वे मार्ग भारतीय रेल्वेच्या अत्यंत व्यस्त मानल्या जाणाऱ्या ‘हायली युटिलाइज्ड नेटवर्क’ चा भाग आहे. हा मार्ग अजमेर, इंदूर, खंडवा, अकोला, पूर्णा, मुदखेड, सिकंदराबाद, मेहबूबनगर आणि धोन या महाराष्ट्रासह इतर राज्यांतील प्रमुख शहरांना जोडतो. त्यामुळे या मार्गाची क्षमता वाढल्याने केवळ प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार नाही, तर मालवाहतुकीलाही मोठी गती मिळून स्थानिक व्यापार आणि उद्योगांना मोठा फायदा होणार आहे.

मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत

मार्गाच्या या आधुनिकीकरणामुळे उच्च वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्या अधिक सुरक्षितपणे चालवता येतील. तसेच मालवाहतूक गाड्यांची क्षमता वाढल्याने भारतीय रेल्वेला 2029-30 पर्यंत 3000 दशलक्ष टन मालवाहतुकीचे ठेवलेले राष्ट्रीय उद्दिष्ट गाठणे सोपे जाणार आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी आंदोलकांबाबात सुप्रीम कोर्टाकडून चांगलाच झटका मिळाला आहे.वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले की, दिल्लीतील जंतर-मंतर किंवा कोणत्याही राज्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिस सध्या कोणतीही कारवाई…

    विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

    पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या त्या धक्कादायक घटनेचा आजही कोणाला विसर पडलेला नाही. नसरापूरच्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची…

    Leave a Reply

    You Missed

    मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

    मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

    विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

    ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

    ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

    NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

    NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

    अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार

    अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार

    भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास;भारतासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट, पंतप्रधानांनीही केल अभिनंदन

    भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास;भारतासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट, पंतप्रधानांनीही केल अभिनंदन

    नागपूरमध्ये वाढता गँगवॉर; मित्रानेच केला घात, आधी इन्स्टाग्रामवर मैत्री केली अन् नंतर घाटावर बोलावून केली हत्या

    नागपूरमध्ये वाढता गँगवॉर; मित्रानेच केला घात, आधी इन्स्टाग्रामवर मैत्री केली अन् नंतर घाटावर बोलावून केली हत्या

    नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

    नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!