रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेची आणि शासकीय अनास्थेची एक अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बातमी समोर आली आहे. तालुक्यामध् डिजीटलच्या मोठ-मोठ्या गप्पा मारल्या जात असून आता मात्र त्याच शाळेची दुरावस्था अन् विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोजवारा उडालेला दिसतो.बापवली येथील जिल्हा परिषद शाळेची पुर्णत: दुरवस्था झाली असून पावसामुळे शाळेच्या भिंतीमधून मोठ्या प्रमाणावर गळती सुरु आहे. छतातून सतत पाणी पडत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेणे निव्वळ अशक्य झाले होते.
शाळेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार
शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अखेर बापवली गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत.संपूर्ण शाळेच्या छपरावर प्लास्टिक टाकले आहे.प्रशासनाची वाट न पाहता ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी घेतलेलं हे पाऊलं खरतंर प्रशासनाने घेणं आवश्यक होतं. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना स्वत:च या मोहिमेत उतारवं लागलं.
शाळेवर प्लास्टिक टाकण्याची वेळ
सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर आता या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “एकीकडे कोट्यवधींच्या विकासाच्या बाता मारायच्या, मोठ्या राजकीय घोषणा करायच्या आणि दुसरीकडे मात्र मतदारसंघातील हक्काच्या सरकारी शाळेला गळती लागल्यावर तिथे प्लास्टिक टाकण्याची वेळ यावी, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?” असा संतप्त सवाल आता मतदार आणि सामान्य नागरिक सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विचारत आहेत.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रशासनासाठी खरंच महत्त्वाचा आहे का?
दरम्यान याबाबत प्रशासनाकडून आता काय पाऊले उचलली जातायत का? या समस्येची दखल घेतली जाणार आहे का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण हा फक्त शाळेच्या सविकासाचा प्रश्न नाहीये तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि भवितव्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे.








