दुरावस्थेचा कळस!भितींमधून पाणी,वर्गात बसणं अशक्य…अखेर शाळेच्या छप्परावर प्लास्टिक टाकण्याची वेळ!

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेची आणि शासकीय अनास्थेची एक अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बातमी समोर आली आहे. तालुक्यामध् डिजीटलच्या मोठ-मोठ्या गप्पा मारल्या जात असून आता मात्र त्याच शाळेची दुरावस्था अन् विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोजवारा उडालेला दिसतो.बापवली येथील जिल्हा परिषद शाळेची पुर्णत: दुरवस्था झाली असून पावसामुळे शाळेच्या भिंतीमधून मोठ्या प्रमाणावर गळती सुरु आहे. छतातून सतत पाणी पडत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेणे निव्वळ अशक्य झाले होते.

 शाळेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार

शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अखेर बापवली गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत.संपूर्ण शाळेच्या छपरावर प्लास्टिक टाकले आहे.प्रशासनाची वाट न पाहता ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी घेतलेलं हे पाऊलं खरतंर प्रशासनाने घेणं आवश्यक होतं. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना स्वत:च या मोहिमेत उतारवं लागलं.

​शाळेवर प्लास्टिक टाकण्याची वेळ

सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर आता या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “एकीकडे कोट्यवधींच्या विकासाच्या बाता मारायच्या, मोठ्या राजकीय घोषणा करायच्या आणि दुसरीकडे मात्र मतदारसंघातील हक्काच्या सरकारी शाळेला गळती लागल्यावर तिथे प्लास्टिक टाकण्याची वेळ यावी, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?” असा संतप्त सवाल आता मतदार आणि सामान्य नागरिक सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विचारत आहेत.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रशासनासाठी खरंच महत्त्वाचा आहे का?

दरम्यान याबाबत प्रशासनाकडून आता काय पाऊले उचलली जातायत का? या समस्येची दखल घेतली जाणार आहे का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण हा फक्त शाळेच्या सविकासाचा प्रश्न नाहीये तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि भवितव्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी खाद्यतेल विक्रीबाबत आपली कारवाई केली होती. खाद्यतेलातील भेसळ आणि गुणवत्तापूर्ण दर्जा कायम ठेवण्यासाठी त्यांनी सुटे खाद्यतेल विक्रीला…

मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मनोरी-गोराई समुद्रकिनारी प्रस्तावित असलेल्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला आणि उभारणीला स्थानिक मच्छिमार, शेतकरी आणि भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बोरीवली येथील आर-मध्य…

Leave a Reply

You Missed

तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

पोल्ट्री व पशुपालक शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात!५ महत्त्वाच्या मागण्यांवर बैठक, सरकारचेही सकारात्मक आश्वासन

गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

गरज नसेल तर सोनं खरेदी टाळा, विदेशातील लग्न सोहळे थांबवा! पीएम मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरातही मोठा बदल

१ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?

१ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?

कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

तुकाराम मुंढेंच्या FDA ची थेट भाजप बैठकीत ‘सरप्राइज एन्ट्री’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत धाडसत्र, अन्नाचे नमुने घेतले ताब्यात!

तुकाराम मुंढेंच्या FDA ची थेट भाजप बैठकीत ‘सरप्राइज एन्ट्री’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत धाडसत्र, अन्नाचे नमुने घेतले ताब्यात!

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिक संपेना! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर १० प्रवासी जखमी

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिक संपेना! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर १० प्रवासी जखमी

तुरुंगात मंत्रजप अन् विचित्र चाळे! भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय; जामीन अर्जावर आज सुनावणी,उज्ज्वल निकम…

तुरुंगात मंत्रजप अन् विचित्र चाळे! भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय; जामीन अर्जावर आज सुनावणी,उज्ज्वल निकम…