दुरावस्थेचा कळस!भितींमधून पाणी,वर्गात बसणं अशक्य…अखेर शाळेच्या छप्परावर प्लास्टिक टाकण्याची वेळ!

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेची आणि शासकीय अनास्थेची एक अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बातमी समोर आली आहे. तालुक्यामध् डिजीटलच्या मोठ-मोठ्या गप्पा मारल्या जात असून आता मात्र त्याच शाळेची दुरावस्था अन् विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोजवारा उडालेला दिसतो.बापवली येथील जिल्हा परिषद शाळेची पुर्णत: दुरवस्था झाली असून पावसामुळे शाळेच्या भिंतीमधून मोठ्या प्रमाणावर गळती सुरु आहे. छतातून सतत पाणी पडत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेणे निव्वळ अशक्य झाले होते.

 शाळेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार

शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अखेर बापवली गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत.संपूर्ण शाळेच्या छपरावर प्लास्टिक टाकले आहे.प्रशासनाची वाट न पाहता ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी घेतलेलं हे पाऊलं खरतंर प्रशासनाने घेणं आवश्यक होतं. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना स्वत:च या मोहिमेत उतारवं लागलं.

​शाळेवर प्लास्टिक टाकण्याची वेळ

सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर आता या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “एकीकडे कोट्यवधींच्या विकासाच्या बाता मारायच्या, मोठ्या राजकीय घोषणा करायच्या आणि दुसरीकडे मात्र मतदारसंघातील हक्काच्या सरकारी शाळेला गळती लागल्यावर तिथे प्लास्टिक टाकण्याची वेळ यावी, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?” असा संतप्त सवाल आता मतदार आणि सामान्य नागरिक सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विचारत आहेत.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रशासनासाठी खरंच महत्त्वाचा आहे का?

दरम्यान याबाबत प्रशासनाकडून आता काय पाऊले उचलली जातायत का? या समस्येची दखल घेतली जाणार आहे का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण हा फक्त शाळेच्या सविकासाचा प्रश्न नाहीये तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि भवितव्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

विक्रमगड विद्यार्थ्यांसाठी एक हात मदतीचा; खाऊ अन् शालेय वस्तूंचे वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन

निसर्ग प्रेमी बहुउद्देशी संस्था महाराष्ट्र राज्य जिल्हा पालघर मधील विक्रमगड तालुक्यामधील एकूण नऊ विविध जिल्हा परिषद शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय वस्तू , खेळाचे साहित्य आणि खाऊ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात…

विश्रांतीनंतर मुंबई,ठाण्यासह राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक;राज्यात कुठे पाऊस अन् कुठे यलो अलर्ट?

राज्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली होती.त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातही शेतीच्या कामांसाठी सगळेचजण आतुरतेने पावसाची वाट पाहत होते.त्यानंतर अखेर शुक्रवार १७ जुलैपासून…

Leave a Reply

You Missed

लोकशाही आता व्हेंटिलेटरवर; सोनम वांगचुक यांच्या भूमिकेबद्दल आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याची तळमळ

लोकशाही आता व्हेंटिलेटरवर; सोनम वांगचुक यांच्या भूमिकेबद्दल आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याची तळमळ

विक्रमगड विद्यार्थ्यांसाठी एक हात मदतीचा; खाऊ अन् शालेय वस्तूंचे वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन

विक्रमगड विद्यार्थ्यांसाठी एक हात मदतीचा; खाऊ अन् शालेय वस्तूंचे वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन

‘माझ्या परवानगीशिवाय कोणतंही औषध देऊ नका’; वांगचुक यांच्या पत्नीचा रुग्णालयाला थेट इशारा

‘माझ्या परवानगीशिवाय कोणतंही औषध देऊ नका’; वांगचुक यांच्या पत्नीचा रुग्णालयाला थेट इशारा

‘बाप्पाकडे एकच प्रार्थना…’ केतन अग्रवालच्या बहिणीचे दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, सियाबद्दलही केला मोठा खुलासा

‘बाप्पाकडे एकच प्रार्थना…’ केतन अग्रवालच्या बहिणीचे दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, सियाबद्दलही केला मोठा खुलासा

विश्रांतीनंतर मुंबई,ठाण्यासह राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक;राज्यात कुठे पाऊस अन् कुठे यलो अलर्ट?

विश्रांतीनंतर मुंबई,ठाण्यासह राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक;राज्यात कुठे पाऊस अन् कुठे यलो अलर्ट?

सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी सुप्रिया सुळे;जंतरमंतर मैदानावर थेट हजेरी,केली महत्त्वाची घोषणा!

सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी सुप्रिया सुळे;जंतरमंतर मैदानावर थेट हजेरी,केली महत्त्वाची घोषणा!

दुरावस्थेचा कळस!भितींमधून पाणी,वर्गात बसणं अशक्य…अखेर शाळेच्या छप्परावर प्लास्टिक टाकण्याची वेळ!

दुरावस्थेचा कळस!भितींमधून पाणी,वर्गात बसणं अशक्य…अखेर शाळेच्या छप्परावर प्लास्टिक टाकण्याची वेळ!

‘मी अन् मुलं जात आहोत…’,सोशल मीडियावर स्टेटस ठेवला अन् शिक्षकाने लेकरांना घेऊन नदीत जीवन संपवलं

‘मी अन् मुलं जात आहोत…’,सोशल मीडियावर स्टेटस ठेवला अन् शिक्षकाने लेकरांना घेऊन नदीत जीवन संपवलं

‘आम्ही खूप विचार केला,पण…’ मराठीतील लोकप्रिय जोडप्याचा लग्नानंतर १५ वर्षानंतर घटस्फोट;सोशल मीडियावर पोस्ट, चाहत्यांना धक्का

‘आम्ही खूप विचार केला,पण…’ मराठीतील लोकप्रिय जोडप्याचा लग्नानंतर १५ वर्षानंतर घटस्फोट;सोशल मीडियावर पोस्ट, चाहत्यांना धक्का