साखरेचा कडू गोडवा! ऐन सणासुदीत साखरेचे दर गगनाला; इतिहासातील सर्वात मोठी भाववाढ, सामान्यांचे बजेट कोलमडले

ऐन सणा-सुदीच्या काळात साखरेने सर्वसामान्यांचं बजेट चांगलंच बिघडवलं आहे. सध्या राज्यातील बाजारपेठेत साखरेनं मोठी उसळी घेतली. साखरेच्या दराचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. सध्या साखरेच्या इतिहासात सर्वात मोठी वाढ ठोक बाजारात झाली आहे. साखरेची किंमत ७,५०० प्रति क्विंटलवर गेली आहे. गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे.

साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली

सध्या राज्यातील बाजारपेठेत साखरेनं मोठी उसळी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या साखरेच्या इतिहासात सर्वात मोठी वाढ ठोक बाजारात झाली आहे. तर वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर गेले आहेत. याचा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

राज्यात साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली असून, साखरेच्या होलसेल दराने गेल्या 24 तासात तब्बल 1 हजार रुपयाची दरवाढ झाली आहे. त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. साखरेच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ व्यापार्‍यांसह ग्राहकांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. तर, काल 19 ऑगस्ट सायंकाळच्या सुमारात होलसेल साखरेचे दर बघितले तर क्विंटल मागे 6 हजार 500 रुपयांवर पोहोचले होते. याच दरात आता मोठी वाढ झाली आहे. आता ही भाववाढ झाल्याने सामान्यांच्या घरातील बजेट कोलमडणार आहे.

 साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता

दरम्यान, आगामी काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. या काळातच साखरेच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे. दरम्यान, अचानक साखरेच्या दरात नेमकी का वाढ होत आहे? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

साखरेच्या दरात का वाढ होण्याचं कारण?

दरम्यान, साखरेच्या दरात का वाढ होत आहे, याबाबतची माहिती काही अभ्यासकांनी दिली आहे. त्यांच्या मत साखरेच्या दरवाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे कारखान्यांकडील साठ्याची कमतरता. साखर कारखान्यांकडे साखरेच्या साठ्याचे प्रमाण कमी झालं आहे. याचा परीणाम पुरवठ्यावर होत आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झालेल्या 2025-26 च्या हंगामात, देशातील साखरेचा वापर उत्पादनापेक्षा जास्त झाला. यामुळे कारखान्यांकडील उपलब्ध साठा हळूहळू कमी होऊ लागला. काही तज्ज्ञांच्या मते, सरकारने उत्पादनाच्या अंदाजानुसार 1.5 ते 2 दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली होती. नंतर ही मर्यादा वाढवून 2 दशलक्ष टन करण्यात आली. निर्यातबंदीपूर्वी, अंदाजे 8 लाख टन साखरेची निर्यात आधीच झाली होती.दरम्यान, सरकार साखर आयात करण्याचा विचार देखील करत आहे.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    SIR च्या आड अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा की सरकारचं नियोजनच चुकीचं? के-पश्चिम वॉर्डमधील ढिसाळ कारभारावर नागरिकांचे प्रश्न

    देशात एकीकडे कोट्यवधी तरुण रोजगाराच्या शोधात भटकत असताना, दुसरीकडे सरकारी विभागांमधील रिक्त पदे भरण्याऐवजी कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण टाकला जात आहे. शिक्षक आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर जनगणना, SIR नोंदणी…

    अपमानापेक्षा मरण बरे! पोलिसांच्या २ वर्षांच्या तडीपार नोटिशीनंतर मंगेश साबळेंचा VIDEO व्हायरल, गावकऱ्यांशी बोलताना ढसाढसा रडले

    मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच असलेल्या मंगेश साबळे यांना पोलिसांनी दोन…

    Leave a Reply

    You Missed

    साखरेचा कडू गोडवा! ऐन सणासुदीत साखरेचे दर गगनाला; इतिहासातील सर्वात मोठी भाववाढ, सामान्यांचे बजेट कोलमडले

    साखरेचा कडू गोडवा! ऐन सणासुदीत साखरेचे दर गगनाला; इतिहासातील सर्वात मोठी भाववाढ, सामान्यांचे बजेट कोलमडले

    SIR च्या आड अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा की सरकारचं नियोजनच चुकीचं? के-पश्चिम वॉर्डमधील ढिसाळ कारभारावर नागरिकांचे प्रश्न

    SIR च्या आड अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा की सरकारचं नियोजनच चुकीचं? के-पश्चिम वॉर्डमधील ढिसाळ कारभारावर नागरिकांचे प्रश्न

    अपमानापेक्षा मरण बरे! पोलिसांच्या २ वर्षांच्या तडीपार नोटिशीनंतर मंगेश साबळेंचा VIDEO व्हायरल, गावकऱ्यांशी बोलताना ढसाढसा रडले

    अपमानापेक्षा मरण बरे! पोलिसांच्या २ वर्षांच्या तडीपार नोटिशीनंतर मंगेश साबळेंचा VIDEO व्हायरल, गावकऱ्यांशी बोलताना ढसाढसा रडले

    शिंदे, साटम ते गोगावले… मनपा इंजिनिअर्सच्या बदली-पदोन्नतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिफारशी, माहिती अधिकारात ‘फील्डिंग’ उघड

    शिंदे, साटम ते गोगावले… मनपा इंजिनिअर्सच्या बदली-पदोन्नतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिफारशी, माहिती अधिकारात ‘फील्डिंग’ उघड

    महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटी ७ लाख मतदार वगळले; ३५ लाख मृत तर ७५ लाख गैरहजर

    महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटी ७ लाख मतदार वगळले; ३५ लाख मृत तर ७५ लाख गैरहजर

    नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे! महिनभरात ५ ते ६ वेळा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण

    नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे! महिनभरात ५ ते ६ वेळा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण

    धुमाळ टीम आणि स्टार हेल्थचा स्तुत्य उपक्रम; मढ आयलंड येथे रविवारी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

    धुमाळ टीम आणि स्टार हेल्थचा स्तुत्य उपक्रम; मढ आयलंड येथे रविवारी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

    महाराष्ट्रात सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित; सर्पदंश नियंत्रणासाठी महत्त्वाचे पाऊल ,सर्पदंशाच्या रुग्णांची डिजिटल नोंद होणार

    महाराष्ट्रात सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित; सर्पदंश नियंत्रणासाठी महत्त्वाचे पाऊल ,सर्पदंशाच्या रुग्णांची डिजिटल नोंद होणार

    रानवलीचा रायगडात डंका! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ जिल्ह्यात प्रथम क्रमांक; ५० लाखांच्या बक्षीसावर मोहर

    रानवलीचा रायगडात डंका! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ जिल्ह्यात प्रथम क्रमांक; ५० लाखांच्या बक्षीसावर मोहर