‘युद्धाच्या पलिकडचा विचार”

लेखक: अमोल भालेराव, संपादक – जागृत महाराष्ट्र न्यूज

भारत-पाकिस्तान दरम्यान मे 2025 मध्ये झालेला तीव्र संघर्ष, ज्यामध्ये सलग 3-4 दिवस गोळीबार, ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी सीमावर्ती भाग धगधगला, हा केवळ लष्करी विजय किंवा पराभवाचा विषय नाही. या युद्धाने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे: देशाला खरोखर युद्धाची गरज आहे का? पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26-28 नागरिकांचा बळी गेला, आणि त्याच्या प्रत्युत्तरात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर हल्ले केले. परंतु, या युद्धात खरे नुकसान किती झाले? उपलब्ध माहितीनुसार, भारतात 47-49 नागरिक आणि 5-6 सैनिक मारले गेले, तर पाकिस्तानात 31-40 नागरिक आणि 11-15 सैनिकांचा मृत्यू झाला. एकूण 94-110 मृत्यूंचा हा आकडा खूपच कमी वाटतो, जेव्हा आपण दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये झालेल्या स्फोटांचा आणि ड्रोन युद्धाच्या तीव्रतेचा विचार करतो. एका गॅस सिलिंडरच्या स्फोटात 4-5 जणांचा जीव जाणाऱ्या देशात, सततच्या लढाऊ विमानांच्या गर्जना, ड्रोन हल्ले आणि अनेक हत्यारांच्या वापराने किती जीव गेले असतील? खरा आकडा लपवला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या युद्धाने खरोखर न्याय मिळाला का? की आणखी कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली?

सरकारकडून अधिकृत मृतांचा आकडा ९४ ते ११० दरम्यान दिला जातो, पण काहीही लपवले गेले नाही का, हा संशय मनात राहतोच. दोन राष्ट्रांमधील प्रचारयंत्रणा, राष्ट्रीय भावना आणि राजकीय प्रतिष्ठा यामुळे दोन्ही देश आपले नुकसान कमी व शत्रूचे अधिक दाखवतात, हे आपण पूर्वीही पाहिले आहे. जेव्हा क्षेपणास्त्रे, ड्रोन हल्ले, लढाऊ विमाने यांचा वापर सलग चार दिवस केला जातो, तेव्हा केवळ १०० मृत्यूंचा आकडा खरा वाटतो का?

प्रश्न इतकाच नाही की किती मृत्यू झाले, तर ते जीवन कुणाचे होते? ते एक जवान होते, कुणाचा मुलगा, पती, वडील होते. ते एक नागरिक होते.

आपण हक्काने विचारायला हवे – हे युद्ध खरंच देशासाठी होते का? की एका भावनिक क्षणी निर्णय घेऊन, देशाच्या अंतर्गत प्रश्नांकडे लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार घडवला गेला?

देशात आजही:

* रुग्णालयात एका बेडवर दोन रुग्ण पडलेले दिसतात.
* टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये महिन्याभराची प्रतीक्षा यादी आहे.
* गावे अजूनही वीज, पाणी, आरोग्य सुविधा यांपासून वंचित आहेत.
* बेरोजगारीच्या विळख्यात तरुण घुटमळत आहेत.
* शाळा, कॉलेजमध्ये शिक्षक अपुरे आहेत.
* कुपोषणामुळे लहान मुलांचे मृत्यू होत आहेत.

या सगळ्यावर उपाय न करता जर संपूर्ण लक्ष सीमापार कारवाईकडे वळवले गेले, तर खरे नुकसान कोणाचे होईल? गरीबांचे, सामान्यांचे, सैनिकांच्या कुटुंबियांचे, आणि आपल्या देशाच्या भविष्याचे.

देशभक्ती म्हणजे केवळ शत्रूवर वार करणे नाही, तर देशातल्या प्रत्येक नागरिकाचा जगण्याचा हक्क सुरक्षित करणेदेखील देशभक्तीच आहे. युद्धात टाळ्या वाजवण्याऐवजी, आपण आपल्या प्रश्नांवर उत्तर मागितले पाहिजे. समाजमाध्यमांवर “देशभक्त” होण्याऐवजी “जागरूक नागरिक” होणे जास्त महत्त्वाचे आहे.

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना खरी श्रद्धांजली हीच असेल – की आपण असा देश घडवू जिथे पुन्हा युद्धाची गरजच भासणार नाही.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, नव्या पिढीच्या संघर्षाची अन् सामाजिक परिवर्तनाची दिशा,सांस्कृतिक वारसा अन् नव्या पिढीची जबाबदारी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक, कादंबरीकार किंवा शाहीर नव्हते; ते भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक सांस्कृतिक योद्धे होते. मातंग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊंनी दारिद्र्य, स्थलांतर, उपेक्षा आणि अन्याय जवळून…

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजू नका; आधी त्यांच्या न्यायासाठी उभे राहा!

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाने गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक राजकीय पक्ष किती गंभीर आहे, हे देशातील विद्यार्थी आणि मतदारांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा…

Leave a Reply

You Missed

राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का! अंतर्गत वाद चव्हाट्यावर,पदाधिकारी का देत आहेत राजीनामे?

राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का! अंतर्गत वाद चव्हाट्यावर,पदाधिकारी का देत आहेत राजीनामे?

शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर