ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाने हाहाकार उडाला असून, आसाममध्ये मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला आहे, तर नागालँडसह इतर पर्वतीय भागांत भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २८ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत आसाममध्ये बुडून आणखी सात जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ७५ झाली आहे.
मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला
आसाम पूर आणि नागालँड भूस्खलन आसाममधील पुरामुळे मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला असून. एकट्या शिवसागरमध्ये २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सात जिल्हे अजूनही पुराच्या तडाख्यात सापडलेत. दरम्यान, नागालँडच्या मोकोकचुंगमध्ये भूस्खलनामुळे भाड्याचे घर कोसळून दोन भावांचा मृत्यू झाला.आसाममधील नद्यांना पूर आला असून,सात जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, नागालँडच्या डोंगराळ भागात सततच्या पावसामुळे भूस्खलन होत आहे.
लोकांना मदत शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. सध्या, राज्यातील शिवसागर, चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव, सोनितपूर आणि कामरूप महानगर हे सात जिल्हे पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
The floods in Assam is worsening. Lakhs of people have been displaced and hundreds of bodies of humans and animals are flowing with the flood water.
Pray for Assam 💔🙏🏻 pic.twitter.com/XTqM208Z1w
— Sayantika (@SayantikaSays) July 26, 2026
आसाममधील पूरस्थितीबाधित क्षेत्र:
राज्यातील शिवसागर, चाराइदेव, गोलाघाट, जोरहाट, नगाव, शोणितपूर आणि कामरूप (मेट्रोपॉलिटन) हे सात जिल्हे पुरामुळे गंभीरपणे प्रभावित झाले आहेत.
नागरिक आणि गावे: सुमारे ३ लाख ३२ हजारहून अधिक नागरिक आणि ६२२ गावे पुराच्या विळक्यात अडकली आहेत.
शेतीचे नुकसान: जवळपास ४५,३४१ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन आणि पिके पाण्याखाली गेली आहेत.
नद्यांची स्थिती: नुमालीगढ येथील धनसिरी नदी अद्यापही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
३.३२ लाख लोकांना फटका, ६२२ गावं पाण्याखाली
६२२ गावं पुरामुळे बाधित झाली आहेत. तब्बल ३,३२,६३९ नागरिक या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहेत. अनेक भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी आणि मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. पुराचा मोठा फटका शेतीला बसला आहे. ४५,३४१.९८ हेक्टरवरील पिकं अजूनही पाण्यात बुडालेली आहेत. धनसिरी नदी नुमालीगड येथे अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. शेकडो किलोमीटरचे रस्ते उद्ध्वस्त झाल्याने संपर्क तुटला आहे.
आर्थिक मदत: मृतांच्या वारसांना एकूण ९ लाख रुपयांची मदत (अनुदान) जाहीर करण्यात आली आहे.
वाहतूक आणि मदतकार्य: एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि प्रशासन मदत साहित्य पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत. मदत सुरु आहे.








