सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.त्यामुळे लहान मुलां तर याचं योग्य ज्ञान असणं फार महत्त्वाचं झालं आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुले व विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे मिळावेत आणि ते जबाबदार नागरिक बनावेत, या उद्देशाने ‘क्विक हील फाउंडेशन’ आणि गोरेगाव पश्चिम येथील ‘पटकर-वर्दै महाविद्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष सायबर जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.

गोरेगाव पश्चिम येथील रवींद्र भारती शाळेत ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या प्रमुख उपक्रमाअंतर्गत हे सत्र पार पडलं. रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दै महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सायबर जनजागृतीचे धडे देण्यात आले.

‘स्टुडंट सायबर वॉरियर्स’कडून मार्गदर्शन

पटकर-वर्दै महाविद्यालयाच्या प्रशिक्षित ‘स्टुडंट सायबर वॉरियर्स’ उपासना विजय माळी आणि समीक्षा नारायण उंबाळकर यांनी या सत्राचे नेतृत्व केलं. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या आणि रंजक भाषेत काही महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केलं. जसं की,

डेटा संरक्षण आणि गोपनीयता: ऑनलाइन जगात आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित कशी ठेवावी.

ऑनलाइन फसवणूक ओळखणे: फिचिंग ,फेक ऑफर्स आणि सायबर फ्रॉडपासून कसे सावध राहावे.

सोशल मीडियाचा सुरक्षित वापर: अनोळखी लोकांशी संवाद साधताना कशी काळजी घ्यायची हे समजावून सांगितलं.

सायबर गुन्ह्यांची तक्रार: सायबर बुलिंग किंवा फसवणूक झाल्यास योग्य ठिकाणी तक्रार कशी करावी याची माहिती दिली.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सत्रादरम्यान प्रत्यक्ष जीवनातील विविध उदाहरणे आणि संवादात्मक खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर विश्वातील धोक्यांची जाणीव करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला , प्रश्न विचारले आणि आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

शाळा व्यवस्थापनाकडून उपक्रमाचे कौतुक

रवींद्र भारती शाळेच्या व्यवस्थापनाने या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल क्विक हील फाउंडेशन आणि पटकर-वर्दै महाविद्यालयाचे मनःपूर्वक आभार मानले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे महत्त्व समजण्यास मदत होते आणि ते इंटरनेटचा वापर अधिक जबाबदारीने करू शकतात, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला.

 

 

 

 

 

 

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    नाशिक जिल्ह्यामध्ये शनिवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान 4.3 मॅग्निट्यूडचा भूकंप नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या…

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी…

    Leave a Reply

    You Missed

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

    रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी

    निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी