गावाचा विकास करायचा असेल तर — जागृत व्हा!या प्रकारच्या उमेदवारांपासून सावध राहा .

“गावाच्या विकासासाठी योग्य नेतृत्व, पारदर्शक कामकाज आणि जबाबदार सदस्य निवडा!”

गावाचा विकास हा निवडणुकीनंतर ठरतो — पण तो चुकीच्या उमेदवारांमुळे थांबतो.
म्हणून प्रत्येक मतदाराने खालील बाबींची कायदेशीर व सामाजिक जाणीव ठेवणे आवश्यक आहे 👇

 अशा प्रकारच्या उमेदवारांपासून सावध राहा :

1. दुसऱ्यांच्या पैशावर किंवा प्रभावाखाली उभे राहणारे उमेदवार —जे स्वतःच्या मताने नव्हे, तर “कोणीतरी सांगितले म्हणून” निवडणुकीत उभे राहतात,असे उमेदवार गावाच्या विकासाऐवजी “स्वार्थी गटांचे प्रतिनिधी” ठरतात.

2. फक्त सांगेल तिथे अंगठा लावणारे सदस्य —ग्रामपंचायतीचे ठराव समजून न घेता, विचार न करता सही करणारे सदस्य हे  महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा, १९५८ अंतर्गत जबाबदारी न पाळणारे ठरतात.

3. सत्ता दुसऱ्याच्या हातात देणारे ‘नामधारी’ सदस्य —असे सदस्य लोकशाहीची खिल्ली उडवतात. संविधानाच्या कलम २४३ नुसारग्रामपंचायत ही लोकप्रतिनिधींनी चालवायची असते, परंतु “छुप्या सत्ताधाऱ्यांनी” नव्हे.

4. ग्रामपंचायत कामकाज, निधी व योजनांची माहिती नसलेले उमेदवार —जे शासनाच्या योजना, ग्रामविकास निधी, जलजीवन मिशन, मनरेगा,स्वच्छ भारत योजना यांची माहिती न ठेवता फक्त ‘निवडणूक’ म्हणून उभे राहतात,ते गावाच्या प्रगतीला थांबवतात.

5. फक्त फॉर्म भरून नंतर गायब होणारे उमेदवार —अशा लोकांनी निवडणूक ही लोकसेवा नव्हे तर ‘छंद’ म्हणून घेतलेली असते.अशा व्यक्तींची पार्श्वभूमी, कामगिरी आणि उपस्थिती तपासा.

6. गावात राहणारा म्हणवून बाहेरच दौरे करणारे नेते —निवडणुकीच्या वेळी गावात दाखवणारे प्रेम आणि नंतर गायब होणारे उमेदवार प्रत्यक्षात ‘गावाशी नाळ तोडलेले’ असतात.

7. सरपंच किंवा सदस्य असूनही ग्रामसभा, योजना, निधीची माहिती न देणारे —ग्रामसभा ही ग्रामपंचायतीची सर्वोच्च संस्था आहे.सरपंचाने ग्रामसभेत सर्व योजनांची माहिती देणे हा कायदेशीर अधिकार आहे
(कलम ७, महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा १९५८).माहिती न देणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आणि पारदर्शकतेचा भंग.

 नागरिकांची जबाबदारी :

प्रत्येक मतदाराने उमेदवाराची कामगिरी, उपस्थिती, पारदर्शकता आणि वर्तन तपासावे.
निवडणुकीपूर्वी आणि नंतर ग्रामसभा हजेरी, विकास अहवाल आणि हिशेब मागावे.
 RTI (माहितीचा अधिकार कायदा २००५) चा वापर करून निधीचा हिशेब मागा.
“कोणी सांगितलं म्हणून मत देऊ नका, विकासासाठी विचार करून मत द्या!”

गावाचा विकास एकट्या व्यक्तीने होत नाही — तो जागृत नागरिक आणि जबाबदार प्रतिनिधींच्या एकत्रित प्रयत्नांनीच होतो.
म्हणून
👉 जागृत व्हा,
👉 प्रश्न विचारा,
👉 जबाबदार निवड करा,
 
“गावाचा विकास तुमच्याच हातात आहे!”

Related Posts

लातूर महानगरपालिका निवडणूक 2025–26 : प्रभाग 4,5,6 व 13,14,15 मधील वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

लातूर महानगरपालिका निवडणूक 2025–26 : प्रभाग 4,5,6 व 13,14,15 मधील वैध उमेदवारांची अंतिम यादी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील लातूर शहरातून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येत आहे.…

धक्कादायक! मुंबई BMC निवडणूक 2025 मध्ये काँग्रेस उमेदवाराची पक्षातून हकालपट्टी अर्ज न भरल्याने मोठी कारवाई | Mumbai Congress Breaking News

Mumbai Congress Breaking News: Congress candidate Neelam Sai Mhatre BMC निवडणूक 2025 मध्ये उमेदवार निलंबित, अर्ज न भरल्याचा ठपका. मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठी आणि धक्कादायक…

Leave a Reply

You Missed

वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द