नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; इको-फ्रेंडली बकरी ईदवरून प्यारे खान यांनाही सुनावलं

भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे आज नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली ठाम भूमिका मांडत टीकेची झोड उठवली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, प्यारे खान आणि ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर त्यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली.

आदित्य ठाकरेंना नाव बदलण्याचा सल्ला

महाराष्ट्र गौसेवा आयोगाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 ते 8 जूनदरम्यान पशू बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर आदित्य ठाकरेंनी “सण साजरे करायला हवेत, पण सरकारने हस्तक्षेप करू नये” अशी भूमिका मांडली होती. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी आपलं आडनाव बदलून ‘खान’ किंवा ‘शेख’ ठेवावं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने अशा प्रकारची वक्तव्ये करणं शोभत नाही.” त्यांनी यावरून ठाकरे कुटुंबाच्या परंपरेचा हवाला देत कठोर शब्दांत आदित्य यांच्यावर निशाणा साधला.

प्यारे खान यांना पलटवार

मंत्री राणेंच्या या वक्तव्यांवर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीस बजावली होती. यावर उत्तर देताना राणे म्हणाले, “प्यारे खान हे इस्लामला बदनाम करणारी भूमिका घेत आहेत. त्यांनी मुस्लिम समाजाचं प्रबोधन करावं, धार्मिक तेढ वाढवणारी विधानं देऊ नयेत.”

इको-फ्रेंडली बकरी ईदचा सल्ला

राणेंनी बकरी ईद इको-फ्रेंडली पद्धतीने साजरी करण्याची मागणी पुन्हा केली. “जसं हिंदू समाज इको-फ्रेंडली दिवाळी आणि होळी साजरी करतो, तसं मुस्लिम समाजानेही जबाबदारीने बकरी ईद साजरी करावी. सोसायट्यांमध्ये बकरे कापल्याने तणाव निर्माण होतो. त्यामुळे वाद, आणि उद्या दंगली होऊ शकतात. अशा परिस्थितीत मी दिलेला सल्ला समाजाच्या हिताचाच आहे,” असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

ठाकरे बंधूंवर टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील एकात्मतेच्या हालचालींवरही राणेंनी टोला लगावत, “ज्यांनी ठाकरे कुटुंब फोडलं, तेच आता एकत्रीकरणाचे लेक्चर देतात. हे कितपत योग्य आहे, याचा विचार जनता करेल,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रयत्नांवर शंका व्यक्त केली.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. त्यांच्या खात्यात लवकरच १,५०० चा हप्ता जमा होण्याची…

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सध्या एकाच नावाचा आणि एकाच दौऱ्याचा दबदबा पाहायला मिळत आहे आणि तो म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड लोकसभा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांचा.…

    Leave a Reply

    You Missed

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा