वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक वेसावा कोळीवाडा सध्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण कोळी समाज हादरून गेला असून प्रशासनाच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वेसावा कोळीवाड्यातील भूमिपुत्र राजू बाळकृष्ण काळथे यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. स्थानिकांच्या मते, महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या पंप जप्ती मोहिमेमुळे त्यांनी सकाळीच घरातील पंप काढून ठेवला होता. मात्र संध्याकाळी मर्यादित वेळेस येणाऱ्या पाण्याचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी पुन्हा पंप जोडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वेसावा कोळीवाड्यातील अनेक घरे शेकडो वर्षे जुनी असून त्यामध्ये जमिनीखाली पाणीसाठवणुकीच्या आधुनिक टाक्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना छतावरील टाक्यांमध्ये पाणी चढवण्यासाठी मोटारींचा वापर करावा लागतो. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई महानगरपालिकेकडून अशा मोटारी जप्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार, शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात अधिकारी घराघरांत जाऊन वैध जलजोडणी असलेल्या मोटारीदेखील जप्त करत आहेत.

या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे पाणीपुरवठा नियमित होत नाही, तर दुसरीकडे पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोटारी जप्त केल्या जात असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून या कारवाईविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, महानगरपालिका नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करू शकत नसेल तर लोकांनी आपल्या घरात पाणी कसे साठवायचे? पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी नागरिकांना मोटारींचा वापर करावा लागत असेल, तर त्यावर दडपशाहीची कारवाई का केली जात आहे? भूजलावरील पारंपरिक हातपंपांनाही बंदी घालून कारवाई केली जात असताना टँकर व्यवसायाला मात्र मोकळीक का दिली जात आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

मुंबईच्या विकासासाठी आपली जमीन, समुद्रकिनारे आणि पारंपरिक व्यवसाय गमावलेल्या कोळी समाजामध्ये या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “आम्ही पाणी मागितले होते, पण त्याची किंमत एका जीवाने का मोजावी लागली?” असा सवाल आता वेसावा कोळीवाड्यातून उपस्थित केला जात आहे.

राजू काळथे यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, वेसावा कोळीवाड्यात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा तसेच पंप जप्ती मोहिमेचा पुनर्विचार करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तसेच के-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी आले यांच्यावर कारवाई करून त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

आता हा केवळ अपघात आहे की प्रशासनाच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम, याचे उत्तर शासन आणि प्रशासनाला द्यावे लागणार आहे. कारण एका भूमिपुत्राचा जीव गेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण वेसावा कोळीवाडा न्यायाच्या प्रतीक्षेत उभा आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, नव्या पिढीच्या संघर्षाची अन् सामाजिक परिवर्तनाची दिशा,सांस्कृतिक वारसा अन् नव्या पिढीची जबाबदारी

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक, कादंबरीकार किंवा शाहीर नव्हते; ते भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक सांस्कृतिक योद्धे होते. मातंग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊंनी दारिद्र्य, स्थलांतर, उपेक्षा आणि अन्याय जवळून…

    विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजू नका; आधी त्यांच्या न्यायासाठी उभे राहा!

    दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाने गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक राजकीय पक्ष किती गंभीर आहे, हे देशातील विद्यार्थी आणि मतदारांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका