बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार,तारीख जाहिर; चित्रपटाबाबत मोठी घोषणा

नितेश तिवारी यांचा बहुप्रतिक्षित पौराणिक चित्रपट ‘रामायण’ बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून काही काळ बाकी असला तरी, त्याचा ट्रेलर मात्र आतापासूनच चर्चेत आला आहे.

रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता, निर्मात्यांनी प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली आहे.

‘रामायण’चा ट्रेलर या दिवशी प्रदर्शित होईल

‘रामायण’चे निर्माते नमित मल्होत्रा ​​यांनी नुकतेच त्यांच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “शुभ ब्रह्म मुहूर्तावर, गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी पहाटे ४:१५ वाजता, आम्ही ‘रामायण’च्या ट्रेलरचे जगभरात स्वागत करत आहोत.” म्हणजेच चित्रपटाचा ट्रेलर ३० जुलै रोजी, ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी प्रदर्शित होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namit Malhotra (@iamnamitmalhotra)


चित्रपटाच्या टीमने नुकतेच दिल्लीत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी ट्रेलरची झलक दाखवण्यात आली आणि चित्रपटाच्या कलाकारांची पहिल्यांदाच ओळख करून देण्यात आली. हा चित्रपट सॅन दिएगो कॉमिक-कॉन २०२६ मध्ये देखील सादर करण्यात आला होता.

‘रामायण’ दोन भागांमध्ये प्रदर्शित केले जाईल 

नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग यावर्षी दिवाळीत, तर दुसरा भाग पुढील वर्षी २०२७ साली दिवाळीत प्रदर्शित होईल. रणबीर कपूर ‘राम’, साई पल्लवी ‘सीता’, सनी देओल ‘हनुमान’, यश ‘रावण’ आणि रवी दुबे ‘लक्ष्मण’ यांच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे बजेट ४,००० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटावर जगभरातील हजारो कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी काम केले.त्यामुळे ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढणार आहे हे नक्की.

 

 

 

 

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

दिशा सालियान प्रकरण! उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; तर पुरावे दडपल्याचा संशय, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चिमाजी आढावांचीही चौकशी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते…

‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन; लेकाच्या आवडीची आणली मूर्ती, जागृत महाराष्ट्रशी संवाद

‘ठरलं तर मग’ लोकप्रिय मालिकेतील अभिनेता अमित भानुशलीच्या घरी मोठ्या थाटात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. त्याच्या घरी दिड दिवसांचा बाप्पा बसतो.दरम्यान अमित जेव्हा बाप्पाला घरी आणण्याच्या तयारीत असताना जागृत महाराष्ट्रशी…

Leave a Reply

You Missed

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा