३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई, पुणे, नाशिकसह या जिल्ह्यांना रेट अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार,उद्या म्हणजेच ३ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा अंदाज ३ ऑगस्ट सकाळी ८:३० ते ४ ऑगस्ट सकाळी ८:३० वाजेपर्यंतच्या २४ तासांसाठी लागू असेल.

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता

कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विखुरलेल्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागासाठी पावसाची संभाव्यता नोंदवण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचण्याचा धोका असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

कोकण किनारपट्टीप्रमाणे पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसराला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळतील.मात्र, पुणे घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.विशेषतः सातारा घाट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने पर्यटक व स्थानिकांनी काळजी घ्यावी.तसेच कोल्हापुरात अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहतील. घाटमार्गांवर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने वाहनचालकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्येही पावसाचा इशारा

नाशिक शहर आणि जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस तर घाट भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होऊ शकते. तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत मध्यम पाऊस अपेक्षित असून, जळगाव जिल्ह्यात तुलनेने हलक्या पावसाचा अंदाज आहे.

प्रशासनाचे आवाहन आणि खबरदारीच्या सूचना

राज्यभरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आणि काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. घाटमार्गाने प्रवास करताना रस्त्यांची स्थिती तपासूनच प्रवास सुरू करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे व स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

रेस्टॉरंट्स, हॉटेलनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आपला मोर्चा आता रुग्णालयांकडे वळवला आहे. रुग्णालयातील रुग्णांना औषधांच्या नावाखाली हजारो पटीने अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार…

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असून, महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांचा अल्टीमेटम दिला आह. जरांगे पाटील यांनी…

Leave a Reply

You Missed

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

“सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

“सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

“ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

“ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी