३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई, पुणे, नाशिकसह या जिल्ह्यांना रेट अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार,उद्या म्हणजेच ३ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा अंदाज ३ ऑगस्ट सकाळी ८:३० ते ४ ऑगस्ट सकाळी ८:३० वाजेपर्यंतच्या २४ तासांसाठी लागू असेल.

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता

कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विखुरलेल्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागासाठी पावसाची संभाव्यता नोंदवण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचण्याचा धोका असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

कोकण किनारपट्टीप्रमाणे पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसराला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळतील.मात्र, पुणे घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.विशेषतः सातारा घाट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने पर्यटक व स्थानिकांनी काळजी घ्यावी.तसेच कोल्हापुरात अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहतील. घाटमार्गांवर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने वाहनचालकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्येही पावसाचा इशारा

नाशिक शहर आणि जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस तर घाट भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होऊ शकते. तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत मध्यम पाऊस अपेक्षित असून, जळगाव जिल्ह्यात तुलनेने हलक्या पावसाचा अंदाज आहे.

प्रशासनाचे आवाहन आणि खबरदारीच्या सूचना

राज्यभरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आणि काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. घाटमार्गाने प्रवास करताना रस्त्यांची स्थिती तपासूनच प्रवास सुरू करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे व स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

भिवंडीच्या गंगारामवाडी भागातील कोहिनूर अपार्टमेंटच्या ‘ए’ विंगमध्ये नूतनीकरणाच्या कामादरम्यान झालेल्या भीषण अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. या अपघातात दहा जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून, तीन जण…

ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं

श्रावण महिन्याचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या जावेळे येथील ऐतिहासिक व अत्यंत जागृत अशा ‘श्री स्वयंभू शिवशंकर जावळेश्वर देवस्थान’ परिसरात श्रावणारंभाची जय्यत तयारी…

Leave a Reply

You Missed

भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

मोठी बातमी! इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग;पाच जणांचा मृत्यू ,तर ४१ जण बेपत्ता

मोठी बातमी! इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग;पाच जणांचा मृत्यू ,तर ४१ जण बेपत्ता

३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई, पुणे, नाशिकसह या जिल्ह्यांना रेट अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई, पुणे, नाशिकसह या जिल्ह्यांना रेट अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

पहिल्याच पावसात फुटला फुगा! अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळा बांधकामात मोठा भ्रष्टाचार, धातूऐवजी सिमेंट; 30 लाखांच्या पुतळ्याचे पावसामुळे सत्य उघड

पहिल्याच पावसात फुटला फुगा! अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळा बांधकामात मोठा भ्रष्टाचार, धातूऐवजी सिमेंट; 30 लाखांच्या पुतळ्याचे पावसामुळे सत्य उघड

ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं

ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, नव्या पिढीच्या संघर्षाची अन् सामाजिक परिवर्तनाची दिशा,सांस्कृतिक वारसा अन् नव्या पिढीची जबाबदारी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, नव्या पिढीच्या संघर्षाची अन् सामाजिक परिवर्तनाची दिशा,सांस्कृतिक वारसा अन् नव्या पिढीची जबाबदारी

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली;शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांचा ताजा अहवाल काय सांगतो?

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली;शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांचा ताजा अहवाल काय सांगतो?

काय ही शासनाची उदासीनता? पक्क्या रस्त्याअभावी गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ

काय ही शासनाची उदासीनता? पक्क्या रस्त्याअभावी गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ

नाशिकवर ढगफुटी आणि अतिवृष्टीचे संकट; प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी,एनडीआरएफ तैनात अन् शाळा-कॉलेजला सुट्टी

नाशिकवर ढगफुटी आणि अतिवृष्टीचे संकट; प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी,एनडीआरएफ तैनात अन्  शाळा-कॉलेजला सुट्टी