जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय. शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक धरणे फुल्ल भरले असून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शहरांना दिलासा मिळत आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचे हे हवामान महाराष्ट्रात कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यातच आता जालना, नांदेड आणि धुळ्यात मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. या शहरांमध्ये नदी प्रवाह सामान्यपेक्षा अनेक पट वाढण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जालना, नांदेड आणि धुळे जिल्ह्यांमध्ये अचानक पुराचा धोका

मंगळवार, ०४ ऑगस्ट, २०२६ रोजी जालना, नांदेड आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये अचानक पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार, या भागांमधील नद्यांचा प्रवाह सामान्य पातळीपेक्षा लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. जालना येथे नदीचा प्रवाह सामान्यपेक्षा ५.९ पट अधिक राहण्याचा अंदाज असून, ५ मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नांदेडमध्ये हा प्रवाह ५.० पट आणि धुळे येथे २.९ पट राहण्याची शक्यता आहे, तर अनुक्रमे ४ मिमी आणि ३ मिमी पावसाचा अंदाज आहे.

नदीकाठच्या आणि सखल भागात राहणाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन

या अलर्टमुळे, नागरिकांनी विशेषतः नदीकाठच्या आणि सखल भागात राहणाऱ्यांनी सतर्क राहावे. पाणी साचण्याची शक्यता असल्याने, अनावश्यक प्रवास टाळावा. नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो. सर्व नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे.

घरातून बाहेर पडताना किंवा प्रवास करताना सुरक्षिततेची खात्री करा

नदीकाठच्या सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अचानक पाणी वाढल्यास जलमय परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे घरातून बाहेर पडताना किंवा प्रवास करताना सुरक्षिततेची खात्री करा. कमी उंचीच्या किंवा पूरप्रवण भागात जाणे टाळावे.अस आवाहन करण्यात आलं आहे.

जालना धुळे सह या जिल्ह्यांनाही अलर्ट?

४ ऑगस्ट रोजी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, साताऱ्यासह घाटमाथ्यावरील भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणासह दक्षिण कोकण आणि गोवा येथे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याच्या सुचना

सध्याचे हे अलर्ट नदी प्रवाहाचे अंदाज आणि पर्जन्यवृष्टीच्या अंदाजित आकडेवारीवर आधारित आहेत. हवामानाच्या बदलत्या परिस्थितीनुसार यात बदल होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

धाराशिवमध्ये राजकारण चांगलेच तापलेलं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील तेरखेडा गावात जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणातून सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)या दोन्ही गटात तुफान राडा झाला.…

मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

भष्टाचार प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतोय. मग ती कोणती नोकरी असो किंवा कोणती परीक्षा. घोटाळेबाज सगळीकडेच असतात. पण नेहमी इतरांचे घोटाळे आणि गुन्हे उघडकीस आणणारेच घोटाळेबाज निघाले तर. होय, मुंबई पोलिस…

Leave a Reply

You Missed

धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

१७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

१७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई